शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कांदा बीज उत्पादनाला यंदा बसणार मधमाश्यांच्या कमतरतेमुळे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 5:59 PM

चांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

ठळक मुद्देपरिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.

आकाश गायखेचांदोरी : निफाड तालुक्यात मधमाश्यांची संख्या कमी झाल्याने कांदा बीजचे परागीकरण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांदा बीज उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.मागीलवर्षी निर्माण झालेली पाणीटंचाई, तसेच दरवर्षी पिकांवर फवारणीसाठी वापरलेली औषधे, कीटकनाशके यामुळे गोदाकाठ व निफाड तालुक्यात मधमाश्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होत आहे.गत सहा महिन्यांपासून कांदा पिकाला चांगला दर मिळत असल्याने चांदोरी, सायखेडा, चाटोरी, करंजगाव, खेरवाडी, सुकेणे, कोठुरे, पिंपळस, चितेगाव, दारणासांगवी, लालपाडी, बेरवाडी, निफाड, मांजरगाव, रवळस तसेच निफाड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकºयांनी रब्बी हंगामात कांदा बीजची लागवड केली. सध्या पीक चांगले बहरले आहे, मात्र त्यांचे परागीकरण करणाºया मधमाश्या नसल्याने कांदा बीज उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यात मधमाश्यांचे प्रमाण अधिक होते तेव्हा मोहोळ काढून मध विक्र ी करणाºयांची संख्या अधिक होती, पण गेल्या दोन वर्षांपासून मधमाश्यांचे मोहोळ दिसत नाही. त्यामुळे गावरान मध मिळत नाही. हे मध अनेक आजारांवर गुणकारी आहे.मधमाश्या कमी होण्याची कारणेमागील वर्षी असलेली पाणीटंचाई तसेच पिकांवर फवारली जाणारी विविध औषधे, तणनाशके यामुळे दिवसेंदिवस मधमाश्या कमी होत आहेत. यावर्षी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असली तरी मधमाश्या दिसत नाही. याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होत आहे.आपल्या भागातील मधमाश्या कमी झाल्यामुळे अनेक पिकांचे परागीकरण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे.- कैलास हांडगे, कांदा उत्पादक शेतकरी, चाटोरी.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी