शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धुक्यामुळे कांदा पिक उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 13:19 IST

येवला : आवक स्थिर असूनही कांद्याच्या दारात घसरण होत असल्याने शेतकरी हा दर पदरात पाडून घेण्यासाठी कांदा विक्र ीला पसंती देत आहे.गेल्या आठवड्यात सलग तीन ते चार दिवस धुक्याने कांदा पिक उध्वस्त करण्याचे काम केले.

येवला : आवक स्थिर असूनही कांद्याच्या दारात घसरण होत असल्याने शेतकरी हा दर पदरात पाडून घेण्यासाठी कांदा विक्र ीला पसंती देत आहे.गेल्या आठवड्यात सलग तीन ते चार दिवस धुक्याने कांदा पिक उध्वस्त करण्याचे काम केले. या धुक्याने कांद्याची पात वाकडी होउन कांद्याची वाढ खुंटली. काही रोगांचाही प्रादुर्भाव या कांद्यावर झाला. त्यामुळे कांदा उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतशिवारात शेतकरी बोलत आहे.गत सप्ताहात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लाल कांद्याच्या आवकेत वाढ झाली. बाजारभावात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. धुक्याने रोपांनाही फटका दिला आहे. मात्र या संकटातूनही शेतकरी सावरत उन्हाळ कांदा लागवडीकडे वळला आहे. यंदाचे कांद्याचे विक्र मी भाव पाहता व पाण्याची उपलब्धता लक्षात घेउन बहुसंख्य शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. कोणतेही संकट आले तरी त्यावर मात करीत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश व सिंगापूर आदी ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. सप्ताहात एकूण कांदा आवक ४५ हजार १७७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान एक हजार, कमाल ५४५१ तर सरासरी ३८०० रु पये प्रति क्विंटलपर्यंत होते. अंदरसूल उपबाजारात कांद्याची एकूण आवक १३ हजार ८० क्विंटल झाली आहे. कांद्याचे बाजारभाव किमान एक हजार, कमाल पाच हजार तर सरासरी ३६०० रु पये प्रति क्विंटल पर्यंत होते. तर आज बाजार समितीत ८०० ट्रॅक्टर कांद्याची आवक होती. मात्र बाजारभाव गेल्या काही दिवसापासून कमी होत आहेत. आज बाजारभाव किमान १ हजार ५०० रु पये, कमाल ४ हजार ३६१ रु पये, तर सरासरी बाजारभाव ३ हजार ८०० रु पये होते.सप्ताहात गहू व बाजरीच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. सप्ताहात गव्हाची एकूण आवक १७ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १९२६, कमाल २५०० तर सरासरी २१०० रु पयांपर्यंत होते. बाजरीची एकूण आवक ४४ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १७१८, कमाल १८९५ तर सरासरी १७५० रु पयांपर्यंत होते.सप्ताहात सोयाबीन टिकून होती तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. सोयबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात सोयबीनची एकूण आवक ७८ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ४१५१, कमाल ४३६८ तर सरासरी ४२०० रु पयांपर्यंत होते.मक्याच्या बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून आले. सप्ताहात मक्याची एकूण आवक २१ हजार ११९ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १७६०, कमाल १९७० तर सरासरी १८५० रु पये प्रती क्विंटल पर्यंत होते.

टॅग्स :Nashikनाशिक