शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कांदा उत्पादनात यंदा होणार घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 09:28 IST

परतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. 

ठळक मुद्देपरतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. कांदा तुटवड्यातुन बाजारपेठेतील कांद्याचे दर देखील वाढण्याची दाट शक्यता आहे.ढगाळ हवामानाचा देखील उन्हाळ कांदा रोपांवर दुष्परिणाम दिसून येऊ लागला आहे.

लासलगाव /नाशिक - यंदाच्या पावसाळ्यात मध्यंतरी झालेल्या दमदार पावसातून निफाड, चांदवड व येवला तालुका तसेच जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लेट खरीप अर्थातच लाल पोळ कांद्याचे पीक घेतले आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक समजल्या जाणाऱ्या कांदा पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. याशिवाय खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, तूर, मुग, उडीद आदी पिके निघाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यंदाही पुढील रब्बी हंगामासाठी अगदी मोठा खर्च करून उन्हाळ कांद्याची मोलामहागाची रोपे टाकले आहेत. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या परतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. 

अवकाळी पावसामुळे शेतजमिनीतच सडू लागलेला लाल पोळ कांदा असो, की दुसरीकडे पुढील रब्बी हंगामातील लागवडीसाठी शेतकऱ्यांनी टाकलेली उन्हाळा कांद्याची रोपे अवकाळी पावसामुळे खराब झालेली आहे. त्यातून शेतकऱ्याने सध्या घेतलेल्या लाल पोळ कांद्याचे होणारे एकरी नुकसान, तसेच उन्हाळा कांद्यासाठीची रोपे कमी होऊन पुढील रब्बी हंगामात अपेक्षित असलेले उन्हाळा कांदा लागवडीखालील क्षेत्रात होणारी घट यामुळे कांद्याबाबतचे सर्वच गणित पुढील काळात बिघडण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे यंदा कांदा उत्पादनात कमालीचा फटका बसताना सरासरी एकरी उत्पादनात शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य मोठे नुकसान बघता शेतकऱ्यांच्या अर्थचक्र कोलमडून पडणार आहेच. तर दुसरीकडे कांदा उत्पादनाचे मोठे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन घटल्यामुळे पुढील काळात संभाव्य कांदा तुटवड्यातुन बाजारपेठेतील कांद्याचे दर देखील वाढण्याची दाट शक्यता आहे.

कांदा पिकाचेही प्रचंड नुकसान

लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा अन् पुढील रब्बी हंगामासाठी टाकलेली उन्हाळा कांद्याची रोपे महासंकटात सापडली गेली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजवरच्या परंपरेप्रमाणे खरीप हंगामातील उशिराने लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा हा उशिरापर्यंत चाललेल्या परतीच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचून राहताना सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी खरीपनंतरच्या 'रब्बी' हंगामासाठी गेल्या महिनाभरात टाकलेली महत्त्वाच्या 'उन्हाळ' कांद्याची रोपे देखील शेतातील वाफ्यामध्ये पाणी साचू लागल्याने सडू लागली आहेत. याबरोबरच सध्याच्या ढगाळ हवामानाचा देखील उन्हाळ कांदा रोपांवर दुष्परिणाम दिसून येऊ लागला आहे.

 

टॅग्स :onionकांदाRainपाऊसNashikनाशिकFarmerशेतकरी