शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कांदा उत्पादनात यंदा होणार घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 09:28 IST

परतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. 

ठळक मुद्देपरतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. कांदा तुटवड्यातुन बाजारपेठेतील कांद्याचे दर देखील वाढण्याची दाट शक्यता आहे.ढगाळ हवामानाचा देखील उन्हाळ कांदा रोपांवर दुष्परिणाम दिसून येऊ लागला आहे.

लासलगाव /नाशिक - यंदाच्या पावसाळ्यात मध्यंतरी झालेल्या दमदार पावसातून निफाड, चांदवड व येवला तालुका तसेच जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लेट खरीप अर्थातच लाल पोळ कांद्याचे पीक घेतले आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक समजल्या जाणाऱ्या कांदा पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. याशिवाय खरीप हंगामातील बाजरी, भुईमूग, तूर, मुग, उडीद आदी पिके निघाल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यंदाही पुढील रब्बी हंगामासाठी अगदी मोठा खर्च करून उन्हाळ कांद्याची मोलामहागाची रोपे टाकले आहेत. मात्र, दीर्घकाळ चाललेल्या परतीच्या पावसामूळे लागवड झालेल्या लाल पोळ कांद्यासह टाकलेल्या उन्हाळ कांद्याच्या रोपांना देखील फटका बसला आहे. 

अवकाळी पावसामुळे शेतजमिनीतच सडू लागलेला लाल पोळ कांदा असो, की दुसरीकडे पुढील रब्बी हंगामातील लागवडीसाठी शेतकऱ्यांनी टाकलेली उन्हाळा कांद्याची रोपे अवकाळी पावसामुळे खराब झालेली आहे. त्यातून शेतकऱ्याने सध्या घेतलेल्या लाल पोळ कांद्याचे होणारे एकरी नुकसान, तसेच उन्हाळा कांद्यासाठीची रोपे कमी होऊन पुढील रब्बी हंगामात अपेक्षित असलेले उन्हाळा कांदा लागवडीखालील क्षेत्रात होणारी घट यामुळे कांद्याबाबतचे सर्वच गणित पुढील काळात बिघडण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे यंदा कांदा उत्पादनात कमालीचा फटका बसताना सरासरी एकरी उत्पादनात शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य मोठे नुकसान बघता शेतकऱ्यांच्या अर्थचक्र कोलमडून पडणार आहेच. तर दुसरीकडे कांदा उत्पादनाचे मोठे आगार समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन घटल्यामुळे पुढील काळात संभाव्य कांदा तुटवड्यातुन बाजारपेठेतील कांद्याचे दर देखील वाढण्याची दाट शक्यता आहे.

कांदा पिकाचेही प्रचंड नुकसान

लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा अन् पुढील रब्बी हंगामासाठी टाकलेली उन्हाळा कांद्याची रोपे महासंकटात सापडली गेली आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आजवरच्या परंपरेप्रमाणे खरीप हंगामातील उशिराने लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा हा उशिरापर्यंत चाललेल्या परतीच्या पावसामुळे शेतजमिनीत पाणी साचून राहताना सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी खरीपनंतरच्या 'रब्बी' हंगामासाठी गेल्या महिनाभरात टाकलेली महत्त्वाच्या 'उन्हाळ' कांद्याची रोपे देखील शेतातील वाफ्यामध्ये पाणी साचू लागल्याने सडू लागली आहेत. याबरोबरच सध्याच्या ढगाळ हवामानाचा देखील उन्हाळ कांदा रोपांवर दुष्परिणाम दिसून येऊ लागला आहे.

 

टॅग्स :onionकांदाRainपाऊसNashikनाशिकFarmerशेतकरी