शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले डोळ्यात पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST

नाशिक : राज्यासह देशांतर्गत उन्हाळी कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या ...

नाशिक : राज्यासह देशांतर्गत उन्हाळी कांद्याची आवक होण्यास सुरुवात झाल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या पंधरवड्यात चार हजार रुपये क्विंटल दराने विक्री होणाऱ्या कांद्याला १,३०० ते १,५०० रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत असल्याने जिल्ह्यातील लासलगाव, सिन्नर, उमराणे व येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सिन्नरमधील उत्पादकांना तोटा

दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सिन्नर तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील पाणीटंचाई दूर झाली. मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी चांगले पैसे मिळतील, या आशेने कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात हवामानातील बदलामुळे कांदा पिकावर करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र, गत पंधरवड्यात कांद्याचे दर ४ हजारांवर गेल्याने कमी उत्पादनातही चांगले पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हा आनंद जास्त काळ टिकला नाही. राज्यासह परराज्यातील उन्हाळी कांद्याची आवक सुरू होताच कांद्याचे दर कमी होण्यास सुरूवात झाली. गत आठवड्यात २,२०० ते २,५०० रुपयांवर आलेले कांद्याचे भाव या आठवड्यात निम्म्यावर आल्याने सिन्नर बाजार समितीत सध्या १,३०० ते १,५०० रुपये इतका कमी दर कांद्याला मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच्या बाजारभावाची तुलना करता, शेतकऱ्यांना क्विंटलमागे अडीच ते तीन हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

येवला : लाल कांद्याच्या दरात घसरण

मानोरी : केंद्र सरकारने कांदा निर्यात उठवल्यानंतर कांद्याला चांगल्याप्रकारे भाव मिळत असताना शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. बाजार समित्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाळी आणि लाल कांद्याच्या दरात विक्रमी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर पुन्हा गडगडले असून, दर पुन्हा हजार रुपयांच्या आत आले आहेत. उन्हाळी कांद्याला किमान ९०० रुपये तर सरासरी १,१०० रुपये प्रतिक्विंटल तर लाल कांद्याला किमान ८०० रुपये तर सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटल इतका कमी भाव मिळाला असून, कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

उन्हाळी आणि लाल कांदा लागवडीत विक्रमी वाढ झाली असून, यंदा अवकाळी पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मिळेल तेथून कांद्याची रोपे विकत घेऊन कांद्याची लागवड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची कांद्याच्या बियाण्यांमध्ये फसगत झाल्याचे शेतकऱ्यांकडूनच सांगितले जात आहे.

दरम्यान, कांद्याच्या दरात सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने उन्हाळी आणि लाल कांदा काढणीला वेग आला असून, कांद्याचे दर अजून किती कमी होतील, याची शाश्वती नसल्याने बाजार समित्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असून, आवक दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. उष्णता दिवसेंदिवस वाढतच असल्याने विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून, उन्हाळी कांद्याला देण्यासाठी मुबलक पाणी विहिरीत नसल्याने शेतकऱ्यांकडून पालखेड आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उन्हाळी कांद्याला अद्यापही चार ते पाच पाणी मुबलक प्रमाणात देणे गरजेचे असून, पालखेड आवर्तनातून वितरिका क्रमांक २१, २५ व २८ला आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.