शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 14:59 IST

लासलगांव : केंद्र सरकारने साठवणुक मर्यादेवर घातलेल्या निणर्याच्या निषेधार्थ व्यापारी सहभागी न झाल्याने जिल्ह्यातील बाजार पेठांमध्ये सोमवारी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. विशेष म्हणजे आवकही झाली नसल्याचे बाजार समितीतफे सांगण्यात आले.

ठळक मुद्देव्यवहार ठप्प : केंद्र सरकारच्या साठवणूक मर्यादेवर घातलेल्या निणर्याचा निषेध, आवकही घटली

लासलगांव : केंद्र सरकारने साठवणुक मर्यादेवर घातलेल्या निणर्याच्या निषेधार्थ व्यापारी सहभागी न झाल्याने जिल्ह्यातील बाजार पेठांमध्ये सोमवारी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले. विशेष म्हणजे आवकही झाली नसल्याचे बाजार समितीतफे सांगण्यात आले.लासलगावी सोमवारी सकाळी कांदा घेऊन येणारी पिकअप जिप व ट्रॅक्टर्स आदी वाहने विक्रीस आलेली नाहीत. याबाबत लासलगाव बाजार समितीस अधिकृत व्यापारी अगर शेतकरी संघटनेचेव वतीने बंद बाबत अधिकृत पत्र प्राप्त झाले नाही अशी माहीती लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. विंचुर येथील कांदा उपआवारावर अवघी चार वाहने कांदा विक्रीस आलेला दिसुन आला.कांदा निर्यातबंदी, आयकर तपासणीसत्र व त्यानंतर कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंधांचे कारणामुळे जिल्ह्यातील व्यापारी केंद्र सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गाकडे नेहमीचे कांदा विक्री करणारे शेतकरी भावाची चौकशी करीत असतात.याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तर एकाच दिवशी सर्व बाजार आवारावर कांदा विक्रीस न आल्याने उत्पादकांनी माल विक्रीस न आणता एक प्रकारे शासकीय विविध निणर्याला विरोधच केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातला आणि शेतक?्यांनी रब्बीचा साठवून ठेवलेला कांदा खराब झाला आहे. साधारणपणे आद्रर्तेनुसार चाळीत साठवलेला कांद्याचे नुकसान ३५ ते ४० टक्के असते. यावर्षी अतिवृष्टीमुळे आद्रर्ता जास्त असल्याने साठलेल्या कांद्याचे प्रमाणापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.निर्यातबंदी लावल्यानंतर राज्यात एकूण १ लाख ४० हजार टन कांद्याची आवक झाली आहे. त्यापैकी अहमदनगरमधून सुमारे २५ हजार टन, नाशिकमधून ८० हजार टन आणि पुण्यातून १३ हजार टन आवक झाली आहे. तसे पहाता एकूण उत्पादनापैकी खरीपात सुमारे १० ते २० टक्के उत्पादन होते. उशीराच्या खरीपात ३५ ते ४० टक्के उत्पादन होते आणि रब्बीनंतर ५० ते ६० टक्के कांद्याची उत्पादन होते. रब्बीत जरी सर्वाधिक उत्पादन होत असले तरी सगळा कांदा विकला.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा