शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

साडेतीन हजार कर्जदारांची वनटाइम सेटलमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:35 IST

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजनेंतर्गत दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या सुमारे साडेतीन हजार कर्जदारांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उर्वरित रक्कम भरल्यामुळे जिल्हा बॅँकेला त्यापोटी शासनाने ५२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

नाशिक : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजनेंतर्गत दीड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या सुमारे साडेतीन हजार कर्जदारांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उर्वरित रक्कम भरल्यामुळे जिल्हा बॅँकेला त्यापोटी शासनाने ५२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.  गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यात शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले होते व त्यापेक्षा अधिक कर्ज असलेल्यांनी दीड लाखाव्यतिरिक्तचे पैसे भरण्यासाठी वनटाईम सेंटलमेंटचा प्रस्तावही ठेवला होता. त्यानुसार नाशिक जिल्हा बॅँकेकडून पीककर्ज घेतलेले, परंतु थकबाकीदार झालेल्या दीड लाखापेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या ३५०१ सभासदांनी दीड लाखाच्या वरील कर्जाची रक्कम भरल्यामुळे त्यांचे दीड लाखांचे कर्ज माफ झाले आहे. या कर्जापोटी जिल्हा बॅँकेस ५२ कोटी ३२ लाख रुपये शासनाने अदा केले आहेत. या योजनेत पात्र असलेल्या उर्वरित शेतकरी सभासदांनी ३१ मार्चच्या आत सहभागी होऊन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी