शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा निर्मितीला दीडशे वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:14 IST

अवैध उत्खननावर ड्रोनची नजर जिल्ह्यात होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर नजर ठेवण्यासाठी राज्यातील पहिला प्रयोग नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आला. ...

अवैध उत्खननावर ड्रोनची नजर

जिल्ह्यात होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर नजर ठेवण्यासाठी राज्यातील पहिला प्रयोग नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आला. हा प्रयोग आता राज्यातही राबविला जाणार आहे. अवैध उत्खननामुळे महसूल वसुलीवर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी १२५ कोटींचा महसूल जमा झाला होता. यंदा त्यांच्या एक तृतीयांशही महसूल जमा झालेला नाही. त्यामुळे महसूलवाढीवाठी चोरीच्या प्रकारावर आळा घालण्यासाठी ड्रोन घिरट्या घालत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील अवैध उत्खनानावर काही प्रमाणात आळा बसला आहे. कोरोना काळात तर अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात वाढले होते.

जिल्हा झाला केरोसिनमुक्त

जिल्ह्यातील सर्व बिगर गॅसजेाडणीधारकांची गॅसची मागणी पूर्ण करीत नाशिक जिल्हा केरोसिसनमुक्त झाला. शाननाने राबविलेल्या ‘धूर मुक्त महाराष्ट्र’ योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येऊन ऑक्टोबर महिन्यातच जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण केले. कोरोना संकटांशी सामना करीत असतानाही जिल्ह्याने धूरमुक्त जिल्हा करण्यासाठी विनागॅसजोडणीधारकांना गॅस देऊन महिलांची चुलीपासून मुक्तता केली. पेठ व सुरगाणा या दोन तालुक्यांना परिपूर्ण केल्यानंतर संपूर्ण जिल्हा केरोसिसमुक्त झाला.

समृद्धी महामार्ग

इगतपुरी ते ठाणेदरम्यान होत असलेल्या समृद्धी महामार्गाने गती घेतली असून, ३२ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. मध्यंतरी कोरोनामुळे या कामाला ब्रेक लागला होता. आता या कामावर मजूर परतल्याने, तसेच वाहतूक व्यवस्थाही सुरळीत झाल्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे. सप्टेंबर, २०२२ मध्ये हे संपूर्ण काम पूर्ण करण्याचे नियोजन असले, तरी कामाच्या गतीमुळे निर्धारित वेळेपेक्षा आधीच काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. इगतपुरी-ठाणेदरम्यानच्या मार्गावरील ८ किलोमीटरचा बोगदा हा सर्वात मोठा बोगदा असणार आहे.

पीक कर्जवाटपाचा विक्रम

जिल्ह्याने यंदा २ हजार २७१ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप केले. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ६५८ कोटी रुपयांचे अधिक पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. जिल्ह्याने पहिल्यांदाच दोन हजार २७१ कोटी रुपये कर्जवाटपाची कामगिरी केली. कोरोनाचा प्रकोप असतानाही पीक कर्जवाटपावर अधिक लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. पीक कर्जवाटपात जिल्हा बँकेने उद्दिष्टापेक्षाही जास्त कर्ज वितरण केले आहे. गेल्या वर्षी ३ हजार १४७ कोटी उद्दिष्ट होते आणि कर्जवाटप १ हजार ६२३ कोटी इतके झाले होते. या वर्षी ३ हजार ३०० एवढे उद्दिष्ट होते, तर कर्ज वितरण २ हजार २७१ कोटी इतके झाले.

अवैध धंदे नियंत्रण समन्वय कक्ष स्थापन

पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्ययातून जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध धंदे नियंत्रण समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला. जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या तक्रारी निकाली काढून गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्याची दक्षता घेतली जात आहे. महसूल, आरटीओ, उत्पादन शुल्क यांचे कामकाजही पोलिसांना करावे लागते. त्यामुळे पोलिसांवर ताण येत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून जिल्ह्यासाठी अवैध धंदे नियंत्रण समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला. हाही राज्यातील एक अभिनव कक्ष ठरला आहे. या कक्षाच्या माध्यमातून सर्व विभागांचा एकमेकांशी समन्वय निर्माण होत आहे.