शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

ग्रामीण सायबर पोलिसांनी राज्यात पटकाविला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 16:24 IST

पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली.

ठळक मुद्दे एकूण १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा मिळविली १०९ गुन्ह्यांपैकी तब्बल ३३ गुन्हे उघडकीस आणण्यास यश

नाशिक : ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या सायबर पोलीस ठाण्याने सायबर गुन्ह्यांमधील रोख रक्कम पुन्हा मिळविण्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सायबर पोलिसांनी २०१९ साली आॅनलाईन सायबर फसवणूकीच्या गुन्ह्यांमधील तब्बल १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा वसूल करण्यास यश मिळविले. तसेच सायबर गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये हे पोलीस ठाणे राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पोलीस महासंचालक कार्यालयात राज्यातील सर्व परिक्षेत्रांचे प्रमुख पोलीस आयुक्त, अधीक्षक यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. इमारतीत सायबर पोलीस ठाणे कार्यरत आहे. या पोलीस ठाण्याचेप्रमुख निरिक्षक सुभाष अनमुलवार, उपनिरिक्षक कल्पेश दाभाडे यांच्यासह नाईक सोनाली पाटील, आरती पारधी, प्रमोद जाधव, परिक्षीत निकम, प्रकाश मोरे, सुनील धोक्रट, विकास टेकुळे, सरिता अक्कर, प्राजक्ता सोनवणे यांचा चमू कार्यरत आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आॅनलाइन फसवणूकीचा छडा लावत या पथकाकडून २०१९ साली तब्बल दाखल २५ गुन्ह्यांमधील १६ लाख ५० हजारांच्या रकमेपैकी एकूण १५ लाख १६ हजाराची रक्कम पुन्हा मिळविली गेली. यामुळे ज्या फिर्यादींची फसवणूक झाली होती, त्यांनाही मोठा दिलासा मिळाला. आॅनलाइन फसवणूकीचा प्रकार लक्षात घेत त्यानुसार आपले कौशल्य वापरू न कायद्याचे निरिक्षण नोंदवित काही गुन्ह्यांत संबंधित बॅँकांना जबाबदार धरत त्यांच्या ग्राहकांची फसवणूकीत गेलेली रक्कमदेखील सायबर पोलिसांनी मिळवून दिली आहे, असे अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. सायबर पोलिसांच्या कामाचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आॅनलाइन पेमेंट अ‍ॅप्लीकेशनचा वाढता वापर अणि आॅनलाइन फसवणूकीचे वाढते प्रमाण यामुळे २०१९साली २५ गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात जिल्ह्याच कानाकोपऱ्यातून दाखल झाले.३३ गुन्हे उघडकीस आणण्यास यशग्रामीण सायबर पोलीसांना मागील तीन वर्षांमध्ये दाखल १०९ गुन्ह्यांपैकी तब्बल ३३ गुन्हे उघडकीस आणण्यास यश आले. त्यामुळे हे पोलीस ठाणे राज्यात गुन्हे उघडकीस आणण्याबाबत चौथ्या क्रमांकावर राहिले. २०१९ साली २५ पैकी १० तर २०१८मध्ये ३६पैकी १० आणि २०१७साली ४८पैकी केवळ १३ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिस यशस्वी झाले होते. मागील वर्षभरापासून सायबर पोलिसांच्या कामगिरीची आलेख अधिक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उंचावलेला आकडेवाडीवरून दिसून येतो.

टॅग्स :Nashikनाशिकcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसArti Singhआरती सिंग