५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचा खर्च उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 05:41 PM2018-07-16T17:41:23+5:302018-07-16T17:59:55+5:30

नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.

nsk,samta,senior,citizan,sangh,students,help | ५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचा खर्च उचलणार

५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचा खर्च उचलणार

Next
ठळक मुद्देसमता ज्येष्ठ नागरिक संघचा अभिनव उपक्रम ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे.
आदिवासी भागातील मुलांचे शिक्षण अनेविध कारणांमुळे अपुर्ण राहाते. त्यांच्यात चांगली गुणवत्ता असूनही त्यांना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे देखील कित्येकदा शिक्षण सोडण्याची वेळ येते. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात खंड पडू नये तसेच दहावीचे महत्वाचे वर्ष लक्षात घेऊन समता ज्येष्ठ नागरिक संघाने पांजरे येथील नुतन विद्यालयातील इयत्ता दहावीतील ५५ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी घेतली आहे.
पखालरोडवरील समता ज्येष्ठ नागरिक संघाकडून राबविण्यात येणाºय अनेक सामाजिक कार्यात शिक्षणाला अग्रक्रम असून यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडून मदतीचा हात पुढे केला जातो. अकोले तालुक्यातील पांजरे येथील जिल्हा परिषदेचय प्राथमिक शाळेतील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक संघाकडून शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम ठाकूर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष डी.एफ. मोरे, सचिव दिनानाथ पाटील, बळवंत शिर्के, शांताराम पोटे, आर.एस. गरूड, चिंतामण अहेर, कृषी अधिकारी व्ही. आर. बांंबळे, मुख्याध्यापक पी.वाय. लांडगे, सौ. सुमन देशमुख उपस्थित होते.

Web Title: nsk,samta,senior,citizan,sangh,students,help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.