शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

निसर्गाशी मैत्री करून माणसाने माणूस बनावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 6:15 PM

नाशिक : एका इंग्रजी लेखकाच्या मतानुसार निसर्ग आणि मानव यांच्यात विनाइंद्रिय संबंध मानले जातात. याच मतानुसार निसर्गाचे नुकसान होणे ...

ठळक मुद्देरावसाहेब कसबे : इको फ्रेन्डली लिव्हिंग पुस्तकाचे प्रकाशननिसर्ग टिकला नाही तर माणूसही टिकणार नाही

नाशिक : एका इंग्रजी लेखकाच्या मतानुसार निसर्ग आणि मानव यांच्यात विनाइंद्रिय संबंध मानले जातात. याच मतानुसार निसर्गाचे नुकसान होणे म्हणजेच माणसाच्या मन आणि शरीराचाच ºहास होण्यासारखे असल्याने मानवाने निसर्गाशी मैत्री करून माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.कालिदास कलामंदिर येथे ‘इक्रो फ्रेन्डली लिव्हिंग’ या डॉ. रेश्मा घोडेराव लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, डॉ. विनोद विजन, डॉ. मनीषा जगताप, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, उद्योगगुरू इरफान कौचाली, देवांग जानी आदी उपस्थित होते.यावेळी कसबे म्हणाले, आपल्या प्रत्येकाचे जीवन हे निसर्गाशी नाते सांगणारे आहे. त्यामुळे आपली मैत्री ही निसर्गाशी असली पाहिजे. निसर्गाची अवकृपा झाली तर माणसाच्या जीवनात मोठा बदल घडतो असे सांगताना निसर्गाने माणसाच्या विनाशाचे सर्व हक्क सुरक्षित ठेवले आहेत असे ते म्हणाले. निसर्गावर प्रेम केले तर तो आपणावर कृपा करतो, परंतु मानवाने निसर्गाचे अतोनात नुकसान केलेले आहे. परंतु निसर्गाचे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही कसबे यांनी सांगितले. निसर्गाचे संरक्षण केले तरच आपलेही संरक्षण होणार आहे. नाहीतर निसर्गाचा नाश झाला तर आपलाही विनाश होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, असे कसबे यावेळी म्हणाले.निसर्गाचे नुकसान करण्याचे अनेक हत्यारे माणसाकडे आहेत, परंतु निसर्ग टिकला नाही तर माणूसही टिकणार नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. खरे तर माणूस अजूनही माणूस बनायचा आहे. माणसाने निसर्गावर प्रेम केले तर निसर्गाकडूनही प्रेमच मिळेल, असे शेवटी कसबे म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.या पुस्तकाच्या आधारे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा आणि शिक्षकांच्या जनजागृती उपक्रमाची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी लेखक रेश्मा घोडेराव यांनी पुस्तकाचे विषय आणि पर्यावरण याविषयीची माहिती दिली. प्रास्ताविक प्रशांत घोडेराव यांनी केले. सूत्रसंचालन जयंत ठोंबरे यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक