शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

निसर्गाशी मैत्री करून माणसाने माणूस बनावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 18:17 IST

नाशिक : एका इंग्रजी लेखकाच्या मतानुसार निसर्ग आणि मानव यांच्यात विनाइंद्रिय संबंध मानले जातात. याच मतानुसार निसर्गाचे नुकसान होणे ...

ठळक मुद्देरावसाहेब कसबे : इको फ्रेन्डली लिव्हिंग पुस्तकाचे प्रकाशननिसर्ग टिकला नाही तर माणूसही टिकणार नाही

नाशिक : एका इंग्रजी लेखकाच्या मतानुसार निसर्ग आणि मानव यांच्यात विनाइंद्रिय संबंध मानले जातात. याच मतानुसार निसर्गाचे नुकसान होणे म्हणजेच माणसाच्या मन आणि शरीराचाच ºहास होण्यासारखे असल्याने मानवाने निसर्गाशी मैत्री करून माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.कालिदास कलामंदिर येथे ‘इक्रो फ्रेन्डली लिव्हिंग’ या डॉ. रेश्मा घोडेराव लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, आयएमएचे अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, डॉ. विनोद विजन, डॉ. मनीषा जगताप, नगरसेवक राहुल दिवे, प्रशांत दिवे, उद्योगगुरू इरफान कौचाली, देवांग जानी आदी उपस्थित होते.यावेळी कसबे म्हणाले, आपल्या प्रत्येकाचे जीवन हे निसर्गाशी नाते सांगणारे आहे. त्यामुळे आपली मैत्री ही निसर्गाशी असली पाहिजे. निसर्गाची अवकृपा झाली तर माणसाच्या जीवनात मोठा बदल घडतो असे सांगताना निसर्गाने माणसाच्या विनाशाचे सर्व हक्क सुरक्षित ठेवले आहेत असे ते म्हणाले. निसर्गावर प्रेम केले तर तो आपणावर कृपा करतो, परंतु मानवाने निसर्गाचे अतोनात नुकसान केलेले आहे. परंतु निसर्गाचे नुकसान म्हणजे आपलेच नुकसान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही कसबे यांनी सांगितले. निसर्गाचे संरक्षण केले तरच आपलेही संरक्षण होणार आहे. नाहीतर निसर्गाचा नाश झाला तर आपलाही विनाश होऊ शकतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, असे कसबे यावेळी म्हणाले.निसर्गाचे नुकसान करण्याचे अनेक हत्यारे माणसाकडे आहेत, परंतु निसर्ग टिकला नाही तर माणूसही टिकणार नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. खरे तर माणूस अजूनही माणूस बनायचा आहे. माणसाने निसर्गावर प्रेम केले तर निसर्गाकडूनही प्रेमच मिळेल, असे शेवटी कसबे म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.या पुस्तकाच्या आधारे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा आणि शिक्षकांच्या जनजागृती उपक्रमाची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी लेखक रेश्मा घोडेराव यांनी पुस्तकाचे विषय आणि पर्यावरण याविषयीची माहिती दिली. प्रास्ताविक प्रशांत घोडेराव यांनी केले. सूत्रसंचालन जयंत ठोंबरे यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक