शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

आता नववी, दहावीतच मिळणार दाखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:30 IST

दहावीच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाच्या तारखेपर्यंतही दाखले मिळत नाही. सर्व्हर डाउन झाल्यामुळे तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होऊन जाते.

नाशिक : दहावीच्या निकालानंतर शैक्षणिक प्रवेशासाठी लागणारे दाखले काढण्यासाठी होणारी गर्दी आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशाच्या तारखेपर्यंतही दाखले मिळत नाही. सर्व्हर डाउन झाल्यामुळे तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होऊन जाते. यंदाही हा प्रश्न प्रकर्षाने समोर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या कामात गतीमानता आणण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांमधूनच विद्यार्थांना दाखले वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सध्या अडकलेल्या हजारो दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे नियोजनदेखील जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.दहावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी लागणाºया दाखल्यांसाठी शहरातील सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होते. हजारोंच्या संख्येने या केंद्रांच्या माध्यमातून दाखले देण्याची प्रक्रिया राबविली जाते. यंदादेखील मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले मात्र सर्व्हर यंत्रणा कोलमडून पडल्यामुळे सुमारे सहा हजार दाखले अडकून पडले आहेत. त्यामुळे अर्ज स्वीकृती आणि दाखले वितरणाची संपूर्ण यंत्रणाच ठप्प पडली होती. अजूनही या यंत्रणेला गती प्राप्त होऊ शकलेली नाही. दाखले अडकून पडल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारींचा पाऊस पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सेतू समितीची बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. शैक्षणिक दाखल्यासंदर्भात अशाप्रकारे सर्व्हर डाउन होण्याचे प्रकार नेहमीचेच झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो.दाखल्यांसाठी केलेल्या अर्जाची छायाप्रत व्हॉट्सअ‍ॅप नंबर, त्यासोबत स्वत:चा जुजबी माहिती, त्या आधारे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सदर अर्ज संबंधित शाखेकडे फॉरवर्ड केला जाणार आहे. संबंधित शाखा प्रमुखांनी अशा अर्जावर तीन दिवसांत काम करून उत्तर देणे बंधनकारक असेल. याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपवर ही तक्र ार निदर्शनास आणून दिली जाईल. मात्र, तरीदेखील विलंब झाल्यास संबंधित कर्मचाºयांवर कारवाई केली जाईल.इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर सेतूमध्ये शैक्षणिकदाखले घेण्यासाठी पालकांची गर्दी होते; मात्र महाआॅनलाइनचे सर्व्हर डाउनमुळे हजारो दाखले प्रलंबित आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना जीव टांगणीला लागतो. दरवर्षी जून-जुलैमध्ये दाखल्यांसाठी होणारी गर्दी व कोलमडणारे नियोजन टाळण्यासाठी पुढील वर्षी जुलैपासूनच शाळांमध्ये वेगवेगळे दाखले नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रदान करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घेतला.तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबरदरवर्षी वेळेत शैक्षणिक दाखले प्रदान करण्यात करण्याच्या प्रक्रियेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याने यापुढे इयत्ता नववी व दहावीत असतानाच विद्यार्थ्यांना शाळेत दाखले प्रदान केले जातील. पुढील वर्षापासून या निर्णयची अंमलबजावणी केली जाईल, असा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला आहे. तसेच, सद्य:स्थितीत दाखले वितरणाचे प्रलबिंत प्रकरणे लक्षात घेता विशेष कक्ष स्थापन करून अर्जदारांना तक्र ार नोंदविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही मांढरे यांनी सांगितले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcollectorजिल्हाधिकारीEducationशिक्षण