शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ना टाळ-मृदंगाचा गजर, ना तमाशाचे फड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 17:07 IST

त्र्यंबकेश्वर : ना टाळ-मृदंगाचा गजर ना तमाशे-कीर्तनाचे फड, ना निर्मळवारी ना दिंड्यांचे वातावरण... या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये सारे कसे शांत शांत आहे. निवृत्तीनाथ मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, मंदिराकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते बॅरीकेडींग करून बंद करण्यात आले आहेत. यंदा अतिशय साधेपणाने यात्रा साजरी होणार आहे.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : निवृत्तीनाथांच्या समाधीची आज पूजा; रस्त्यांवर बॅरिकेटिंगचे अडथळे

त्र्यंबकेश्वर : ना टाळ-मृदंगाचा गजर ना तमाशे-कीर्तनाचे फड, ना निर्मळवारी ना दिंड्यांचे वातावरण... या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये सारे कसे शांत शांत आहे. निवृत्तीनाथ मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली असून, मंदिराकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते बॅरीकेडींग करून बंद करण्यात आले आहेत. यंदा अतिशय साधेपणाने यात्रा साजरी होणार आहे.यंदा यात्रा रद्द झाल्याने वारकऱ्यांच्या दिंड्यांची संख्याही रोडावली असून अनेक दिंड्या मोजक्या वारकऱ्यांच्या संख्येने दर्शन करून लगेच परतीचा मार्ग धरत आहेत. वारकरी दर्शनासाठी येत आहेत परंतु गेल्या सातशे वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला माहोल यंदा नाही. दरवर्षी दिंड्यांमधील लाऊडस्पीकरचा आवाज घुमत असतो. कीर्तन, भारुड, भजन, चित्रपटांतील गाणी असा एकच गोंगाट असतो. कडाक्याच्या थंडीमुळे शेकोट्या पेटलेल्या दिसतात. परंतु, यंदा हे सारे चित्र पालटले आहे.दि. ७ व ८ फेब्रुवारीला एकादशी असून तरी दि ८ रोजी असणारी भागवत एकादशी वारकरी भाविकांसाठी मुख्य आणि महत्वाची असते. त्यामुळे या दोन्ही दिवशी त्र्यंबकेश्वरी वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते सपत्नीक संजीवन समाधीची महापूजा होईल. यावेळी मोजक्याच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.निर्मळ वारीतही खंडगत ३-४ वर्षापासून जिल्हा प्रशासनाने निर्मळ वारी हा उपक्रम राबविण्यास त्र्यंबक नगरपरिषदेला आदेश दिले होते. त्यानुसार शहरात निर्मळ वारी राबविण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था येत असतात. परंतु यंदा कोरोनामुळे निर्मळ वारीतही खंड पडणार आहे. प्रदुषण मुक्त व पर्यावरण पूरक यात्रा पार पडावी हा मुळ उद्देश प्रशासनाचा असतो. मात्र या वर्षी यात्रेला गर्दीच होणार नसल्याने ना निर्मळ वारी ना पर्यावरण पुरक यात्रा.कोट्यवधीची उलाढाल थंडावलीयात्रेत दरवर्षी कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत असते. अनेक ठिकाणी चहा, प्रसाद, वाणाचे सामान, खेळण्या, फराळाचे पदार्थ यांचे स्टॉल्स लागतात. परंतु यावर्षी गर्दीवरच नियंत्रण आणल्याने फारशी दुकाने लागलेली नाहीत. त्यामुळे कोट्यवधीची उलाढाल थंडावणार आहे. पूजेसाठी प्रथमच वारकऱ्यांना मानसंत निवृत्तीनाथ मंदिराकडे जाणारे तीन रस्ते बॅरिकेडस‌् लावून बंद करण्यात आले आहेत. भाविकांना मंदिरात प्रवेश नाही. तर त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व दरवाजाने धर्मदर्शन रांगेने भाविकांना प्रवेश राहणार आहे. संत निवृत्तीनाथ मंदिरात पहाटे ५ वाजता होणाऱ्या पूजेत वारकऱ्यांना प्रथमच मान देण्यात आला असून त्यांना पुजेत समावून घेणेत आले आहे तर दि. ८ रोजी पहाटेची महापूजा त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने होणार आहे.

मानाच्या दिंड्यांना संत निवृत्तीनाथ मंदिरात २० वारकरी अशी संख्या धरून प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. मंदिराला विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर बस स्थानक गजानन महाराज मंदिर समोरील जागेत जव्हारफाटा येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान यात्रेकरूंच्या खाजगी वाहनांना नगरीत प्रवेश दिला जाणार नाही तर त्यांना गट नंबर १२५ येथे पार्किंग सुविधा देण्यात आली आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरtempleमंदिर