शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:55 AM

पाटोदा : यापुढे कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही, असा ठराव पाटोदा येथे आयोजित शेतकरी एल्गार परीषदेत करण्यात आला आहे. शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत असून, राज्यात एकाच दिवशी प्रत्येक प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पाटील झांबरे यांनी दिली.

ठळक मुद्देपाटोदा : शेतकरी एल्गार परिषदेत ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : यापुढे कोणतीही सरकारी बाकी भरायची नाही, असा ठराव पाटोदा येथे आयोजित शेतकरी एल्गार परीषदेत करण्यात आला आहे. शेतकरी एल्गार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जनजागृती करण्यात येत असून, राज्यात एकाच दिवशी प्रत्येक प्रांत कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पाटील झांबरे यांनी दिली.राज्यात परतीच्या पावसाने संपूर्ण शेतीचे स्मशान झाले असून, शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नुकसानीच्या पंचनाम्यात शर्ती घातल्याने अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचित राहणार असल्याने शासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. राज्यात मागील वर्षाचा दुष्काळ आणि यंदाच्या परतीच्या पावसाने शेतक्यांच्या हातातोंडाशी आलेल्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या पाश्वभूमीवर होऊ घातलेल्या आॅक्टोबर मार्च महिन्यातील इ. दहावी, बारावीच्या परीक्षांसह डिग्री, पदवी पदवीत्त्युर परीक्षांची फी राज्य शासनाने माफ करावी, अशी मागणी शेतकरी एल्गार परिषदेचे संयोजक, शेतकरी नेते प्रा. शिवाजी भालेराव यांनी यावेळी केली.यावेळी कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, छावाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे, सूर्यभान नाईकवाडे आदींनी या परिषदेला मार्गदशन केले.शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, शेतीसाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, संपूर्ण कर्ज माफी करावी यासह विविध ठराव यावेळी करण्यात आले. यावेळी जाफर पठाण, रमेश बोरणारे, प्रभाकर बोरनारे, साहेबराव आहेर, विलास पवार, उस्मान शेख, मारु ती घोरपडे, कैलास नाईकवाडे, रघुनाथ नाईकवाडे, भास्कर बोराडे, आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो ०५ पाटोदा)मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने काही शेतकºयांनी शेतातील नुकसान झालेली पिके जमा करून खळ्यावर जमा करून ठेवली अशा शेतकºयांच्या पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त करीत माणूस मेल्यावर मढ किती दिवस झाकून ठेवायचा, असा संतप्त सवाल शेतकºयांनी या परिषदेत उपस्थित करीत शासनाचा निषेध केला.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी