शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मनपा ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ तपासणी मोहीम राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:15 IST

शहरात कोणतेही बांधकाम करताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंधारण) सक्तीचे असले तरी प्रत्यक्षात अनेक इमारतींवर अशाप्रकारची व्यवस्था नावालाच आहे तर अनेक ठिकाणी नावाला फोटो जोडले जातात.

नाशिक : शहरात कोणतेही बांधकाम करताना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (पर्जन्य जलसंधारण) सक्तीचे असले तरी प्रत्यक्षात अनेक इमारतींवर अशाप्रकारची व्यवस्था नावालाच आहे तर अनेक ठिकाणी नावाला फोटो जोडले जातात. तथापि, गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने निरीच्या शिफारसी मान्य केल्याने आता महापालिकेने त्याकडे लक्ष देण्याचे ठरविले आहे. महापालिकेच्या वतीने लवकरच संपूर्ण शहरात तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा नसल्यास प्रति वर्षी एक हजार रुपये या दराने दंडवसूल करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे अलीकडेच दिल्ली येथे राष्टÑीय हरित लवादाने अशाच प्रकारच्या ‘रेन वॉटर हार्वेस्टिंगवर सुनावणी करताना ही व्यवस्था न करणाऱ्या संस्थांना पाच लाख रुपये दंड करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकमध्ये गोदावरी नदी प्रवाही राहावी यासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेला अनुषंघून निरी या संस्थेनेदेखील रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्याची शिफारस केली आहे. भूजल पातळी वाढली तर नदी प्रवाही राहू शकेल, असे निरी या संस्थेचे म्हणणे असून उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.यासर्व पार्श्वभूमीवर आता महापालिकेनेदेखील त्याकडे लक्ष घातले आहे. महापालिकेच्या विकास योजना आराखडा व विकास योजना नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०१७ मध्ये मंजूर झाली आहे. मंजूर विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियंत्रण नियमावली तरतुदीनुसार ५०० चौरस मीटारवरील भूखंड विकासन करताना पर्जन्य जलसंधारणची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. त्यानुसार भोगवटा दाखला देताना पर्जन्य जलसंधारण व्यवस्थेबाबत शहानिशा करूनच भोगवटा दाखला देण्यात येतो. तथापि, ज्या ठिकाणी भोगवटा दाखला देण्यात आला आहे, त्याठिकाणीदेखील त्या व्यवस्थित ठेवण्यात आल्या आहेत किंवा नाही याची तपासणी अभियंत्यामार्फत करण्यात येणार आहे. ज्या इमारतीवर अशी व्यवस्था नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे़उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महापालिकेने केली पाहिजे. ती करण्यासाठी सर्व प्रथम हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, उद्योग, व्यापारी यांना उद्युक्त केले पाहिजे आणि सर्वांत शेवटी सामान्य नागरिकांवर सक्ती केली पाहिजे. चेन्नई महापालिकेच्या वतीने प्रबोधन करून अशाप्रकारे मोहीम राबविण्यात आली होती. त्या आधारेच नाशिकमध्येदेखील राबविणे सोयीचे ठरेल.- राजेश पंडित, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRainपाऊस