शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
4
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
5
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
6
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
7
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
8
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
9
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
10
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
11
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
12
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
13
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
14
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
15
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
16
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
17
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
18
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
19
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
20
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...

वर्ष नवे, कारभारीही नवे; आता हवे प्रगतीचे कवडसे!

By किरण अग्रवाल | Updated: January 5, 2020 13:17 IST

वर्षाचा सांधेबदल होत असताना राज्यातले व नाशिक महापालिकेतले कारभारी बदलले, त्यापाठोपाठ पंचायत समित्यांचे व जिल्हा परिषदेतले पदाधिकारीही बदललेत. हे नवे नेतृत्व नवी उमेद घेऊन आले आहे. त्यांच्या कामकाजावरच पुढील निवडणुका लढल्या जातील. तेव्हा, त्यांच्या हातून विकासाचे चक्र अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील नवीन पदाधिकाऱ्यांपुढे विकासाचे आव्हान जिल्ह्याला १९ वर्षांनंतर दोन कॅबिनेट मंत्रिपदे, अपेक्षा उंचावणे स्वाभाविक राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तिचाकी समीकरणाचा लाभ जिल्ह्यातहीजिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतील स्पर्धेतून पक्षांतर्गत रस्सीखेचही उघड

सारांश

यंदा नवीन वर्ष येताना राजकीय परिघावरही नावीन्यता घेऊन आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह राज्यात नवे कारभारी सत्तारुढ झाले असल्याने २०२० या वर्षात नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या वाटा पूर्वीपेक्षा अधिक प्रशस्त झालेल्या दिसून येण्याची अपेक्षा आहे. एकीकडे राज्यात मंत्रिपदांचे समतोल वाटप झाले नसल्याची ओरड होत असताना नाशिक जिल्ह्याला मात्र तब्बल १९ वर्षांनंतर दोन कॅबिनेट मंत्रिपदे लाभली आहेत, त्यामुळेही या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक ठरले आहे.

सरलेल्या २०१९ या वर्षात राज्यातील राजकारणाने अनपेक्षित कलाटणी घेतली व वेगळ्या समीकरणांनी सरकार सत्तेत आले. यात नाशिक जिल्ह्याला तशी समाधानकारक संधी लाभली. १९९५मधील ‘युती’ सरकारमध्ये सर्वाधिक चार मंत्रिपदे नाशिकला लाभली होती. गेल्यावेळी नाशकातील तीनही जागा व ग्रामीणमध्येही चांदवडची जागा भाजपला लाभल्याने फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातूनही एखादे मंत्रिपद अपेक्षित होते; पण अखेरपर्यंत संधी मिळाली नाही. शिवसेनेने मात्र दादा भुसे यांना राज्यमंत्री केल्याने जिल्ह्याकडे एकमात्र लाल दिवा होता. यंदा छगन भुजबळ व भुसे या दोघांना कॅबिनेट मंत्रिपदे मिळाली आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही भुजबळांमुळे जिल्ह्याकडेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नववर्ष राजकीयदृष्ट्या नवी आशा घेऊन आल्याचे म्हणता यावे.

महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षाच्या अखेरच्या चरणात राज्यात सत्तांतर झाले, त्यानंतर नाशिक महापालिकेतही कारभारी बदलले. स्पष्ट बहुमत असल्याने सत्ता भाजपकडेच राहिली; पण पक्षनिष्ठ सतीश कुलकर्णी महापौरपदी आरूढ झाले. त्यापाठोपाठ नवीन वर्ष तालुका पंचायत समित्यांमध्येही नवे नेतृत्व घेऊन आले. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तिचाकी समीकरणाचा लाभ जिल्ह्यातही झाला. १५ पैकी सहा सभापतिपदे शिवसेनेला, तर पाच राष्ट्रवादीला लाभली. तब्बल आठ उपसभापतिपदेही शिवसेनेकडे गेली. पंचायत समित्यांमधील या निवडीत केवळ एकमात्र चांदवडचे सभापतिपद भाजपकडे गेले. त्र्यंबकेश्वरी अपक्षाला, तर सुरगाण्यात माकपला संधी लाभली. शिवाय, जिल्हा परिषदेतही अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सयाजीराव गायकवाड बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे ग्रामविकासाची सूत्रे ज्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मार्फत हलतात, तेथेही नवीन नेतृत्व आले. या नवीन कारभाऱ्यांकडून आता विकासाच्या अपेक्षा आहेत. विशेषत: तीन पक्षीयांच्या सामीलकीमुळे जि.प. व पंचायत समित्यांमध्ये विरोधाचा प्रश्न उरलेला नसल्यामुळे संबंधिताना करून दाखवावे लागणार आहे.

अर्थात, जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेतील स्पर्धेतून पक्षांतर्गत रस्सीखेचही उघड होऊन गेली. राज्यातील सत्तेत ठाकरे पिता-पुत्रांचा एकाचवेळी झालेला समावेश पाहता, त्यांनी घराणेशाहीच जपल्याचा आरोप होत असल्याने त्यांचे शागिर्दही तसलाच प्रयत्न करणे ओघाने आले. घरातच दोन आमदारक्या असताना येवल्याच्या सौ. सुरेखा दराडे यांचे नाव जि.प. अध्यक्षपदासाठी रेटले गेले. पण अंतिमत: क्षीरसागर यांना ती संधी लाभली. त्यांच्यामुळे निफाड तालुक्याला तब्बल १४ वर्षांनी जि.प. अध्यक्षपद लाभले. निफाडची आमदारकी शिवसेनेकडून गेली असली तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद लाभले. चांदवडचे डॉ. गायकवाड हे आमदारकीची निवडणूक लढलेले नेतृत्व, मविप्रसारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेत ते संचालक म्हणून चांगले कार्य करीत आहेत. त्यांना जि.प.त उपाध्यक्षपदाची संधी लाभली. गेल्यावेळी हे पद काँग्रेसला लाभले होते. यंदा ते राष्ट्रवादीकडे गेले. त्यामुळे क्षीरसागर व गायकवाड यांच्या या नववर्षातील निवडी अपेक्षा उंचावणाºया म्हणता याव्यात.

सत्ता कुठलीही असो, नवीन पदाधिकारी वा कारभारी येतात तेव्हा प्रत्येकाकडूनच नावीन्यपूर्वक कामकाजाच्या अपेक्षा बाळगल्या जातात. यंदा नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडी झाल्याचा योगायोग जुळून आला. एरव्ही आपण सारेच नवीन वर्षात पाऊल ठेवताना नवा संकल्प करतो, नवे काही घडविण्याची इच्छा सिद्धीस नेण्याची धडपड करतो. त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थातले नवे कारभारीआपल्या कामातील चुणूक दाखवतील, अशी अपेक्षा आहे. करण्यासारखे खूप आहे. आव्हानेही कमी नाहीत. हवी आहे ती प्रबळ इच्छाशक्ती.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समितीShiv Senaशिवसेना