शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

नवे निर्बंध : 'वीकेण्ड'ला कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटा पर्यटकांसाठी पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 17:42 IST

नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बैठक घेतली.

ठळक मुद्देवन्यजीव विभाग अन‌् २६ गावांच्या बैठकीत झाला निर्णयपर्यटकांची होणार ॲन्टिजेन चाचणीमहिनाभरापुर्वीच अभयारण्य पर्यटनावर निर्बंधडेल्टा प्लसची भीती

नाशिक : "डेल्टा प्लस' या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिकवन्यजीव विभागाने कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य व आजुबाजुची पर्यटनस्थळे 'वीकेण्ड'ला बंद ठेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाशिक, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांलगतच्या पर्यटनावर निर्बंध आल्याने अभयारण्य भागात पर्यटकांची झुंबड उडत होती. यामुळे अभयारण्यातील गावांच्या सुरक्षिततेसाठी शनिवार, रविवारी अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे माहिती नाशिक वन्यजीव विभागाने दिली आहे.

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट च्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. दरम्यान, डेल्टा प्लस चा शिरकाव गावपातळीवर होऊ नये, यासाठी नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी गावकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून शनिवार, रविवारी पर्यटकांना मज्जाव करण्याच्या निर्णयावर सर्वांनी शिक्कामोर्तब केल्याचे रणदिवे यांनी सांगितले. याप्रसंगी भंडारदरा वनक्षेत्रपाल अमोल आडे, राजूरचे वनक्षेत्रपाल दत्तात्रट पडवळे, वनपाल रवींद्र सोनार यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची चिन्हे दिसत असताना नाशिक वनवृत्तामधील कळसुबाई-हरिश्चंद्रगड, नांदुरमध्यमेश्वर, जळगावचे यावल आणि धुळे येथील अनेर डॅम अभयारण्यांच्या वाटा ८जून रोजी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.

महिनाभरापुर्वीच अभयारण्य पर्यटनावर निर्बंधजेमतेम महिना होत नाही तोच या कोरोनाच्या डेल्टा या उत्परिवर्तित विषाणूने डोके वर काढले आहे. या विषाणुने वातावरणात टिकाव धरण्यासाठी पुढची पायरी गाठली असून डेल्टा प्लस असे त्याला नाव देण्यात आले आहे. महिनाभरात कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील पर्यटनावर निर्बंध घालण्याची वेळ ओढावली आहे.या पर्यटनस्थळांवर मज्जावअभयारण्य परिसरातील रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदीर, साम्रदची सांदण व्हॅली, रतनगड, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, नेकलेस वॉटरफॉल, न्हाणी वॉटरफॉल, कुमशेतचा परिसर, इकोसिटी घाटघर, पांजरे वॉटरफॉल आदी पर्यटन केंद्रांवर पर्यटकांना वीकेण्डला जाता येणार नाही.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटनRainपाऊस