शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
3
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
4
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
5
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
6
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
7
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
9
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
10
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
11
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
12
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
13
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
14
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
15
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
16
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
17
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
18
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
19
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
20
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
Daily Top 2Weekly Top 5

नवे निर्बंध : 'वीकेण्ड'ला कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटा पर्यटकांसाठी पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 17:42 IST

नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बैठक घेतली.

ठळक मुद्देवन्यजीव विभाग अन‌् २६ गावांच्या बैठकीत झाला निर्णयपर्यटकांची होणार ॲन्टिजेन चाचणीमहिनाभरापुर्वीच अभयारण्य पर्यटनावर निर्बंधडेल्टा प्लसची भीती

नाशिक : "डेल्टा प्लस' या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिकवन्यजीव विभागाने कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य व आजुबाजुची पर्यटनस्थळे 'वीकेण्ड'ला बंद ठेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नाशिक, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांलगतच्या पर्यटनावर निर्बंध आल्याने अभयारण्य भागात पर्यटकांची झुंबड उडत होती. यामुळे अभयारण्यातील गावांच्या सुरक्षिततेसाठी शनिवार, रविवारी अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे माहिती नाशिक वन्यजीव विभागाने दिली आहे.

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट च्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. दरम्यान, डेल्टा प्लस चा शिरकाव गावपातळीवर होऊ नये, यासाठी नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी गावकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून शनिवार, रविवारी पर्यटकांना मज्जाव करण्याच्या निर्णयावर सर्वांनी शिक्कामोर्तब केल्याचे रणदिवे यांनी सांगितले. याप्रसंगी भंडारदरा वनक्षेत्रपाल अमोल आडे, राजूरचे वनक्षेत्रपाल दत्तात्रट पडवळे, वनपाल रवींद्र सोनार यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची चिन्हे दिसत असताना नाशिक वनवृत्तामधील कळसुबाई-हरिश्चंद्रगड, नांदुरमध्यमेश्वर, जळगावचे यावल आणि धुळे येथील अनेर डॅम अभयारण्यांच्या वाटा ८जून रोजी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.

महिनाभरापुर्वीच अभयारण्य पर्यटनावर निर्बंधजेमतेम महिना होत नाही तोच या कोरोनाच्या डेल्टा या उत्परिवर्तित विषाणूने डोके वर काढले आहे. या विषाणुने वातावरणात टिकाव धरण्यासाठी पुढची पायरी गाठली असून डेल्टा प्लस असे त्याला नाव देण्यात आले आहे. महिनाभरात कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील पर्यटनावर निर्बंध घालण्याची वेळ ओढावली आहे.या पर्यटनस्थळांवर मज्जावअभयारण्य परिसरातील रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदीर, साम्रदची सांदण व्हॅली, रतनगड, कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, नेकलेस वॉटरफॉल, न्हाणी वॉटरफॉल, कुमशेतचा परिसर, इकोसिटी घाटघर, पांजरे वॉटरफॉल आदी पर्यटन केंद्रांवर पर्यटकांना वीकेण्डला जाता येणार नाही.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटनRainपाऊस