शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

'पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा... अन् वेळत परत जा...', अखेर 'मान्सून'ने घेतला देशाचा निरोप

By अझहर शेख | Updated: October 23, 2022 18:56 IST

नेटिझन्सने सोशल मिडियावर नैऋुत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला निरोप दिला आहे. 

नाशिक : 'पुढच्या वर्षी लवकर ये, अन् वेळेवर परत जा...' अशा शब्दांत नेटिझन्सने सोशल मिडियावर नैऋुत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनला निरोप दिला. रविवारी (दि.२३) देशाच्या उर्वरित भागातून मान्सून परतल्याचे हवमान खात्याचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवर जाहीर केले. मान्सून देशाच्या उर्वरित सर्व भागातून परतला आहे. यामुळे बळीराजाला हा मोठा दिलासा आहे. यावर्षी नाशिकमध्ये देखील विक्रमी पावसाची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यांत पावसाने यापुर्वीचे सर्वच आकड्यांना मागे टाकले. या हंगामात सुमारे १,२१९.५ मिमी इतका पाऊस नाशिक शहरात सप्टेंबरअखेरपर्यंत झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली आहे.

 कधी नव्हे तो इतका यावर्षी सप्टेंबर महिन्यात ३१७.२ मिमी इतका उच्चांकी पाऊस पडला. जून महिन्यात शंभरीदेखील न गाठलेल्या पावसाने जुलैमध्ये थेट पाच शतक ठोकले. ११ ते १२ जुलै दरम्यान २४ तासांत शहरात सर्वाधिक ९७.४ मिमी इतका पाऊस पडला होता. हा पाऊस हंगामाातील उच्चांकी ठरला. नाशिकमध्ये २०१९सालानंतर यावर्षी सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत १७५.८ मिमी इतका पाऊस पडला आहे.

'सीतरंग'ने चुकविला होता ठोकापरतीच्या पावसामुळे ओला दुष्काळसदृश्य स्थती ओढावली होती. दिपावलीच्या तोंडावर बंगालच्या उपसागरामध्ये ‘सीतरंग’नावाचे चक्रीवादळ घोंगावू लागल्याने पुन्हा एकदा काळजाचा ठोका चुकला; मात्र त्यातच मान्सूनने देशाच्या उर्वरित भागातूनसुद्धा माघार घेतल्याची वार्ता हवामान खात्याकडून आल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला.

परतीच्या प्रवासात जोरदार 'तडाखा' मान्सूनने परतीच्या प्रवासात जोरदार तडाखा दिला. सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतपीकांची मोठी नासाडी झाली. यामुळे बळीराजाचा मोठा हिरमोड झाला; मात्र मान्सून देशातील उर्वरित भागातूनदेखील बाहेर पडल्याचे हवामान खात्याने सांगितले आणि ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना निसर्गाकडून एकप्रकारे ‘गिफ्ट’ मिळाले. २४ तासांत कोकणातील दोन शहरे वगळता राज्यात कोठेही पावसाची नोंद रविवारी झाली नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसSocial Mediaसोशल मीडिया