शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

अंधश्रद्धा निर्मूलन आजच्या काळाची गरज : समीर शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:53 AM

वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे असा साधा सोपा अर्थ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असली तरी आज जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते.

पंचवटी : वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणे फार महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव तपासणे असा साधा सोपा अर्थ आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केलेली असली तरी आज जनता अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेली दिसते. छोट्या छोट्या गोष्टीत आपण अंधश्रद्धा बाळगतो जनतेने अंधश्रद्धा निर्मूलन करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन समीर शिंदे यांनी केले.म्हसरूळ येथील प्रभाग क्र मांक एकच्या वतीने व गुलमोहरनगर ओम गुरु देव हास्य सरिता यांच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शिंदे यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर गुंफले. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आपण विज्ञानाची करणी घेतली, परंतु विचारसरणी घेतलेली नाही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ वाढविणे गरजेचे आहे. बुवाबाजी समाजाला लागलेली कीड असून, त्याचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. आजही समाजात प्रस्थापित असलेले बुवाबाबा मांत्रिक लोकांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करतात. या सर्वांना आळा घालण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या प्रयत्नाने जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने सर्व प्रकारच्या गोष्टींना आळा घालण्यास मदत होणार आहे. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा टाळण्यासाठी लोकांनी जीवनमान सुधारले पाहिजे. महाराष्ट्रात संतांच्या विचारसरणीचा वारसा फार महत्त्वाचा आहे, असे ते म्हणाले.आजचे व्याख्यानविषय : भारूडवक्ते: मयुर देशमुख

टॅग्स :Nashikनाशिक