शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात स्मार्ट सिटी कंपनी हवी की नको, याचा निर्णय घेण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:51 IST

नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्ये स्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कंपनी परंतु प्रत्यक्षात स्टेक होल्डर म्हणजेच भागधारकांनाच अंधारात ठेवून काम होत असल्याने अशी कंपनी ठेवायची किंवा नाही येथूनच आता चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यानिमित्ताने स्मार्ट सिटीचा देखील सोक्षमोक्ष लागु शकतो.

ठळक मुद्देप्रत्येक प्रकल्प वादातचसंचालकच कंपनीवर नाराज

संजय पाठक, नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्येस्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कंपनी परंतु प्रत्यक्षात स्टेक होल्डर म्हणजेच भागधारकांनाच अंधारात ठेवून काम होत असल्याने अशी कंपनी ठेवायची किंवा नाही येथूनच आता चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यानिमित्ताने स्मार्ट सिटीचा देखील सोक्षमोक्ष लागु शकतो.

शहरे उत्तम दर्जाची झाली पाहिजेत याबाबत कोणाचेही दुमत नाही. मुळात स्मार्ट शहर म्हणजे काय तर त्या शहराचा शाश्वत विकास करण्याची ग्वाही होय. पर्यावरण निर्सग टिकेल आणि त्यामाध्यमातून शहर किंवा जनजीवन टिकेल अशा पध्दतीच्या विकासाची ही कल्पना मात्र राबविणाऱ्यांना त्याविषयी कितपत माहिती असावी या विषयी शंकाच आहे. एखाद्या योजनेत पाचशे हजार कोटी रूपये मिळत आहेत, म्हणून रस्ते, पाणी गटारी किंवा अफलातून योजनांची टेंडर काढायची आणि त्यामाध्यमातून विदेशाच्या धर्तीवर दोन पाच कल्पना राबवायच्या अशा प्रकारचा समज एकुणच यात निर्माण झाला आहे. आता जे झाले ते झाले परंतु अशा योजना राबविण्याची पध्दती कशी असावी कामे तरी निर्दोष व्हावी किंवा नाही असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

महापालिका सारख्या संस्थामध्ये सरकारी पध्दतीने कोणतेही काम होेते त्याला विलंब होते त्यामुळे त्याला छेद देऊन वेगाने कामांना मंजुरी मिळावी यासाठी स्मार्ट सिटीसाठी नाशिक स्मार्ट सिटी कंपनी लिमीटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. आता तोही इतिहास झाला आहे. परंतु चार वर्षांनतरही कंपनीचे कामकाज हे चांगल्या पध्दतीने झाले नाही असे संचालक म्हणत असेल तर आता खरोखरीच मुल्यमापनाची वेळ आली आहे. कंपनीने कालीदास कलामंदिराचे काम केले ते वादग्रस्त ठरले. महात्मा फुले कलादालानचे नुतनीकरण केले त्याचा काही भाग कोसळला त्यानंतरही हे काम करणाºया ठेकेदाराला पन्नास लाख देण्याच्या हालचाली सुरू आहेत. नेहेरू उद्यानाचे नुतनीकरण झाले म्हणजे नक्की काय झाले हे अनेकांना अजूनही कळले नाही. आणि स्मार्ट रोडच्या कामाविषयी काय बोलावे: स्मार्ट रोड नको पण काम आवर अशाप्रकारची नाशिककरांची मानसिकता झाली असेल तर कंपनीचा कामकाज कसे आहे यापेक्षा वेगळे बोलके उदाहरण ते कोणते?

नागरीकांना विश्वासात घेतले जात नाही नगरसेवकांना महापालिकेचे अपत्य असलेल्या कंपनीविषयी काहीच माहिती नाही आणि संचालक अंधारात ठेवले जातात. मग कंपनी कोणासाठी काम करीत आहे, नाशिककरांसाठी की प्रोजेक्ट राबविणाºया ठेकेदारांसाठी? खरे तर पक्षाभिनिवेश विसरून यावर चर्चा करण्याची वेळ आहे. ते शक्य असेल तर कंपनीचे भवितव्य कठीण आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी