शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

नाशकात स्मार्ट सिटी कंपनी हवी की नको, याचा निर्णय घेण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:51 IST

नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्ये स्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कंपनी परंतु प्रत्यक्षात स्टेक होल्डर म्हणजेच भागधारकांनाच अंधारात ठेवून काम होत असल्याने अशी कंपनी ठेवायची किंवा नाही येथूनच आता चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यानिमित्ताने स्मार्ट सिटीचा देखील सोक्षमोक्ष लागु शकतो.

ठळक मुद्देप्रत्येक प्रकल्प वादातचसंचालकच कंपनीवर नाराज

संजय पाठक, नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्येस्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कंपनी परंतु प्रत्यक्षात स्टेक होल्डर म्हणजेच भागधारकांनाच अंधारात ठेवून काम होत असल्याने अशी कंपनी ठेवायची किंवा नाही येथूनच आता चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यानिमित्ताने स्मार्ट सिटीचा देखील सोक्षमोक्ष लागु शकतो.

शहरे उत्तम दर्जाची झाली पाहिजेत याबाबत कोणाचेही दुमत नाही. मुळात स्मार्ट शहर म्हणजे काय तर त्या शहराचा शाश्वत विकास करण्याची ग्वाही होय. पर्यावरण निर्सग टिकेल आणि त्यामाध्यमातून शहर किंवा जनजीवन टिकेल अशा पध्दतीच्या विकासाची ही कल्पना मात्र राबविणाऱ्यांना त्याविषयी कितपत माहिती असावी या विषयी शंकाच आहे. एखाद्या योजनेत पाचशे हजार कोटी रूपये मिळत आहेत, म्हणून रस्ते, पाणी गटारी किंवा अफलातून योजनांची टेंडर काढायची आणि त्यामाध्यमातून विदेशाच्या धर्तीवर दोन पाच कल्पना राबवायच्या अशा प्रकारचा समज एकुणच यात निर्माण झाला आहे. आता जे झाले ते झाले परंतु अशा योजना राबविण्याची पध्दती कशी असावी कामे तरी निर्दोष व्हावी किंवा नाही असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

महापालिका सारख्या संस्थामध्ये सरकारी पध्दतीने कोणतेही काम होेते त्याला विलंब होते त्यामुळे त्याला छेद देऊन वेगाने कामांना मंजुरी मिळावी यासाठी स्मार्ट सिटीसाठी नाशिक स्मार्ट सिटी कंपनी लिमीटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. आता तोही इतिहास झाला आहे. परंतु चार वर्षांनतरही कंपनीचे कामकाज हे चांगल्या पध्दतीने झाले नाही असे संचालक म्हणत असेल तर आता खरोखरीच मुल्यमापनाची वेळ आली आहे. कंपनीने कालीदास कलामंदिराचे काम केले ते वादग्रस्त ठरले. महात्मा फुले कलादालानचे नुतनीकरण केले त्याचा काही भाग कोसळला त्यानंतरही हे काम करणाºया ठेकेदाराला पन्नास लाख देण्याच्या हालचाली सुरू आहेत. नेहेरू उद्यानाचे नुतनीकरण झाले म्हणजे नक्की काय झाले हे अनेकांना अजूनही कळले नाही. आणि स्मार्ट रोडच्या कामाविषयी काय बोलावे: स्मार्ट रोड नको पण काम आवर अशाप्रकारची नाशिककरांची मानसिकता झाली असेल तर कंपनीचा कामकाज कसे आहे यापेक्षा वेगळे बोलके उदाहरण ते कोणते?

नागरीकांना विश्वासात घेतले जात नाही नगरसेवकांना महापालिकेचे अपत्य असलेल्या कंपनीविषयी काहीच माहिती नाही आणि संचालक अंधारात ठेवले जातात. मग कंपनी कोणासाठी काम करीत आहे, नाशिककरांसाठी की प्रोजेक्ट राबविणाºया ठेकेदारांसाठी? खरे तर पक्षाभिनिवेश विसरून यावर चर्चा करण्याची वेळ आहे. ते शक्य असेल तर कंपनीचे भवितव्य कठीण आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी