शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

नाशकात स्मार्ट सिटी कंपनी हवी की नको, याचा निर्णय घेण्याची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:51 IST

नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्ये स्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कंपनी परंतु प्रत्यक्षात स्टेक होल्डर म्हणजेच भागधारकांनाच अंधारात ठेवून काम होत असल्याने अशी कंपनी ठेवायची किंवा नाही येथूनच आता चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यानिमित्ताने स्मार्ट सिटीचा देखील सोक्षमोक्ष लागु शकतो.

ठळक मुद्देप्रत्येक प्रकल्प वादातचसंचालकच कंपनीवर नाराज

संजय पाठक, नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्येस्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कंपनी परंतु प्रत्यक्षात स्टेक होल्डर म्हणजेच भागधारकांनाच अंधारात ठेवून काम होत असल्याने अशी कंपनी ठेवायची किंवा नाही येथूनच आता चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यानिमित्ताने स्मार्ट सिटीचा देखील सोक्षमोक्ष लागु शकतो.

शहरे उत्तम दर्जाची झाली पाहिजेत याबाबत कोणाचेही दुमत नाही. मुळात स्मार्ट शहर म्हणजे काय तर त्या शहराचा शाश्वत विकास करण्याची ग्वाही होय. पर्यावरण निर्सग टिकेल आणि त्यामाध्यमातून शहर किंवा जनजीवन टिकेल अशा पध्दतीच्या विकासाची ही कल्पना मात्र राबविणाऱ्यांना त्याविषयी कितपत माहिती असावी या विषयी शंकाच आहे. एखाद्या योजनेत पाचशे हजार कोटी रूपये मिळत आहेत, म्हणून रस्ते, पाणी गटारी किंवा अफलातून योजनांची टेंडर काढायची आणि त्यामाध्यमातून विदेशाच्या धर्तीवर दोन पाच कल्पना राबवायच्या अशा प्रकारचा समज एकुणच यात निर्माण झाला आहे. आता जे झाले ते झाले परंतु अशा योजना राबविण्याची पध्दती कशी असावी कामे तरी निर्दोष व्हावी किंवा नाही असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

महापालिका सारख्या संस्थामध्ये सरकारी पध्दतीने कोणतेही काम होेते त्याला विलंब होते त्यामुळे त्याला छेद देऊन वेगाने कामांना मंजुरी मिळावी यासाठी स्मार्ट सिटीसाठी नाशिक स्मार्ट सिटी कंपनी लिमीटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. आता तोही इतिहास झाला आहे. परंतु चार वर्षांनतरही कंपनीचे कामकाज हे चांगल्या पध्दतीने झाले नाही असे संचालक म्हणत असेल तर आता खरोखरीच मुल्यमापनाची वेळ आली आहे. कंपनीने कालीदास कलामंदिराचे काम केले ते वादग्रस्त ठरले. महात्मा फुले कलादालानचे नुतनीकरण केले त्याचा काही भाग कोसळला त्यानंतरही हे काम करणाºया ठेकेदाराला पन्नास लाख देण्याच्या हालचाली सुरू आहेत. नेहेरू उद्यानाचे नुतनीकरण झाले म्हणजे नक्की काय झाले हे अनेकांना अजूनही कळले नाही. आणि स्मार्ट रोडच्या कामाविषयी काय बोलावे: स्मार्ट रोड नको पण काम आवर अशाप्रकारची नाशिककरांची मानसिकता झाली असेल तर कंपनीचा कामकाज कसे आहे यापेक्षा वेगळे बोलके उदाहरण ते कोणते?

नागरीकांना विश्वासात घेतले जात नाही नगरसेवकांना महापालिकेचे अपत्य असलेल्या कंपनीविषयी काहीच माहिती नाही आणि संचालक अंधारात ठेवले जातात. मग कंपनी कोणासाठी काम करीत आहे, नाशिककरांसाठी की प्रोजेक्ट राबविणाºया ठेकेदारांसाठी? खरे तर पक्षाभिनिवेश विसरून यावर चर्चा करण्याची वेळ आहे. ते शक्य असेल तर कंपनीचे भवितव्य कठीण आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी