शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

स्वत:पेक्षा राष्ट्राचे स्थान महत्त्वाचे पंडित : चांडक-बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:38 AM

नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण न करता लोककल्याण म्हणून राज्य केल्याने त्यांना लोककल्याणकारी राजा म्हटले जाते.

ठळक मुद्दे शिवरायांचे विचार आदर्शवत दोन दिवसीय परिषदेतील आढावा सादर

नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण न करता लोककल्याण म्हणून राज्य केल्याने त्यांना लोककल्याणकारी राजा म्हटले जाते. मराठ्यांमध्ये जी ऊर्जा होती त्याचा मूळ स्त्रोत शिवराय होते. शिवरायांचे विचार आदर्शवत असून, स्वत:पेक्षा राष्टÑ महत्त्वाचे हे धोरण प्रत्यक्ष अमलात आणले पाहिजे, असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित यांनी केले.चांडक-बिटको महाविद्यालयात दोनदिवसीय छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि आधुनिक काळातील त्यांचा संदर्भ या विषयावरील राष्टÑीय परिषदेच्या समारोप सत्रात अध्यक्ष पदावरून प्राचार्य पंडित बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. एस.जी. देवधर, उपप्राचार्य डॉ.डी.जी. बेलगावकर, प्राचार्य राम कुलकर्णी, डॉ.ए.आर.पठारे, प्रा. जयंत भाभे, डॉ. महेश औटी, डॉ. मंजुषा कुलकर्णी आदी उपस्थित होते. सकाळच्या दोन सत्रात शिवाजी महाराज आणि किल्ले प्रशासन, राजनीती या विषयांवर डॉ. विनायक गोविलकर, गिरीश टकले, उद्योजक धनंजय बेळे, पांडुरंग बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० प्राध्यापकांनी संशोधनपर प्रबंध सादर केले. यावेळी प्राचार्य राम कुलकर्णी यांनी दोन दिवसीय परिषदेतील आढावा सादर केला. तर डॉ. डी. जी. बेलगावकर यांनी ५ सत्रांचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन प्रा. विजया धनेश्वर, डॉ. शायोन्ती तलवार यांनी केले व आभार प्रा. जयंत भाभे यांनी मानले. भारत इतिहास परिषद पुणेचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी शिवरायांचे जीवनकार्य व विचार केवळ अभ्यासापुरते नसून प्रत्यक्ष कृतीत आणण्याची गरज आहे. शिवरायांनी आरमार उभारून सागरावर परकीयांच्या वर्चस्वाला आव्हान दिले. त्यांची रणनीती-राष्टÑधर्म हा प्रथम धर्म होता. शिवरायांचे युद्धतंत्र तर अचंबित करणारे होते, असे बलकवडे यांनी स्पष्ट केले.