शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

थंडीच्या कहरने नाशिककर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:58 IST

थंडीचा कहर शहरासह जिल्ह्यात सुरूच असून, शनिवारी (दि.९) किमान तापमानाचा पारा थेट ४ अंशांपर्यंत घसरला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नाशिककर पुन्हा गारठले आहेत. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली असून, सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिक राज्यात पुन्हा अव्वलस्थानी राहिले आहे.

ठळक मुद्देगारठा : पारा थेट ४ अंशांपर्यंत घसरला

नाशिक : थंडीचा कहर शहरासह जिल्ह्यात सुरूच असून, शनिवारी (दि.९) किमान तापमानाचा पारा थेट ४ अंशांपर्यंत घसरला. त्यामुळे थंडीच्या कडाक्याने नाशिककर पुन्हा गारठले आहेत. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली असून, सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिक राज्यात पुन्हा अव्वलस्थानी राहिले आहे.उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑसह विदर्भ गारठला आहे. हवामान खात्याकडून प्राप्त सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात थंडीची लाट रविवारी (दि.१०) मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अनावश्यकरीत्या सकाळी व संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळावे. उबदार कपड्यांचा पुरेपूर वापरास प्राधान्य द्यावे. सकाळच्या वेळीस व्यवसाय करणाºया विक्रेत्यांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.शहराचे किमान तापमान पाच दिवसांपूर्वी १७ अंशांपर्यंत वर सरकले होते. त्यामुळे थंडीपासून दिलासा नागरिकांना मिळाला होता; मात्र थंड वाºयाचा वेग अचानकपणे वाढल्याने किमान व कमाल तापमानात मोठी घसरण होऊन शनिवारी (दि.९) सकाळी साडेआठ वाजता पारा ४ अंशांवर घसरला तर कमाल तापमान ३२ अंशांवरून २४ अंशांपर्यंत खाली आल्याने थंडीची तीव्रता अधिकच जाणवत आहे. त्यामुळे नाशिककर शुक्र वारपासून कमालीचे गारठले आहेत.बुधवारी रात्रीपासून शहरात थंड वारे वेगाने वाहू लागल्याने वातावरणात निर्माण झालेला गारवा कायम टिकून राहिला आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत ताशी १३ कि.मी. वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली होती. त्यामुळे शुक्रवारी किमान तापमान १३.२ अंशांवरून थेट ९ अंशांवर घसरले. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेनंतर पुन्हा थंड वाºयाचा वेग वाढल्याने शनिवारी सकाळी पारा ४ अंशांपर्यंत घसरला. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.थंडीच्या कडाक्याने घरात बसणेदेखील मुश्कील झाल्यामुळे उघड्यावर झोपडीत राहणाºया भटक्या लोकांचे आतोनात हाल होत आहे. तसेच गोदेच्या किनारी उघड्यावर किंवा मंदिरांच्या आवारात राहून रात्र काढणारे भिक्षुकवर्ग थंडीने बेहाल झाला असून, गोदाकाठावर शेकोट्या पेटवून हा ऊब मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान