शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

पडझड झालेल्या घरांची मिळेना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 7:59 PM

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच ...

नाशिक : गेल्या जुलै-आॅगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांना आलेला पूर आणि पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली तसेच संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले. या नुकसानीचे पंचनामे होऊन आता सहा महिन्यांचा कलावधी उलटूनही पडझड झालेल्या काही घरमालकांना अजूनही नुकसानभरपाई मिळू शकलेली नाही. त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.यंदा धरणक्षेत्रात झालेला पाऊस आणि जिल्ह्यात सर्वदूर कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर आला होता. या पुराचा सर्वाधिक फटका नाशिक शहरासह चांदोरी आणि सायखेडा या गावांना बसला तसेच बागलाण, पेठ, मालेगाव, निफाडमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. पुराच्या पाण्यात काठांवरील घरे तसेच दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांमधील आणि दुकानदारांचे साहित्य वाहून गेले आहे. शेतांमध्येदेखील काही फुटांपर्यंत पाण्याचे तळे साचल्यामुळे पिकांचेदेखील नुकसान झाले होते.या नुकसाचीने पंचनामे पूर्ण करण्यात येऊनही सर्वच नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. पीक नुकसानीची भरपाई प्राधान्याने देण्यात आली. संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने त्यांनादेखील तातडीची दिली जाणारी मदत देण्यात आली आहे. मात्र पडझड झालेल्या घरांसाठीची मदत लांबणीवर पडली आहे. पंचनाम्यानंतर संबंधित घराला मान्यता आहे किंवा नाही याबरोबरच संबंधित घरमालकाला धोकादायक घर म्हणून नोटीस बजविण्यात आली होती का? या मुद्द्यावर नुकसानभरपाई रखडली आहे.पंचनामे आणि प्रांतांनी नुकसानीस पात्र ठरवूनही आता, मात्र अधिकृत अनधिकृतच्या मुद्द्यावर सुमारे ३५ लाखांची भरपाई अजूनही नुकसाग्रस्तांनी मिळू शकलेली नाही.पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या १६ पथकांनी अंशत: आणि पूर्णत: पडलेल्या ९६४ घरांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले होते. घरांच्या नुकसानीची भरपाई तातडीने देण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागांतही अशा प्रकारचे पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुरामुळे ज्यांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले त्यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेल्या मदतीचे सुमारे ५१४ कोटींचे वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे. मात्र ज्यांचे घरे वाहून गेली त्यातील अनेक बाधित अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीriverनदी