शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नाशकात भूगर्भ शास्त्रज्ञ ठोकणार दोन वर्षे तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 1:43 AM

नाशिक जिल्ह्णातील कळवण व पेठ या तालुक्यांच्या सीमेवर वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीच्या भूगर्भ विभागाचे शास्त्रज्ञ आगामी दोन वर्षे नाशकात तळ ठोकणार असून, त्यात भूगर्भातील हालचाली व भूकंपाचे धक्के बसण्यामागच्या कारणांची मीमांसा केली जाणार आहे. भूकंपाच्या संभाव्य नुकसानीपासून बचावासाठी या काळात उपाययोजनेचा आराखडाही तयार केला जाणार आहे.

ठळक मुद्देदोन वर्षे अभ्यास : भूकंपाचा केंद्रबिंदू शोधणार

नाशिक : नाशिक जिल्ह्णातील कळवण व पेठ या तालुक्यांच्या सीमेवर वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीच्या भूगर्भ विभागाचे शास्त्रज्ञ आगामी दोन वर्षे नाशकात तळ ठोकणार असून, त्यात भूगर्भातील हालचाली व भूकंपाचे धक्के बसण्यामागच्या कारणांची मीमांसा केली जाणार आहे. भूकंपाच्या संभाव्य नुकसानीपासून बचावासाठी या काळात उपाययोजनेचा आराखडाही तयार केला जाणार आहे.गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दळवट, जयदर या पेठ तालुक्यातील गावांबरोबरच कळवण तालुक्यातील ओतूर, कुंडाणे आदी गावांना गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे धक्के बसू लागले आहेत. रिश्टल स्केलवर या धक्क्यांची नोंद ३ सेल्सिअस असली तरी, त्यात भविष्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भूकंपामुळे जीवित व वित्तहानी आजवर झालेली नाही, मात्र भूगर्भातील हालचालींमुळे विहिरींचे पाणी आटणे, घरांना तडे जाण्याचे प्रकार होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नाशिक शहरालाही गेल्या वर्षभरात दोन ते तीन वेळा भूकंपाचे हलके धक्के बसले, त्याचा केंद्रबिंदू नाशिकपासून ३० किलोमीटर अंतरावर दर्शविण्यात आला. त्यामुळे नाशिकपासून जवळ असलेल्या या दोन्ही तालुक्यांतील भूगर्भात काही तरी गंभीर हालचाली होत असल्याचा अंदाज आहे. त्याची दखल घेत भूगर्भातील या साºया हालचालींबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून वेळोवेळी राज्य सरकारला कळविण्यात आले व केंद्र सरकारलाही त्याबाबत अवगत करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन गेल्या आठवड्यात भूगर्भ शास्त्रज्ञांच्या एका पथकाने नाशिक येथे भेट देऊन भूकंपाचे धक्के जाणवणाºया गावांची सविस्तर माहिती करून घेतली. तसेच भूकंपरोधक आराखडाही तयार करण्यात येणार आहे. त्यात प्रामुख्याने रिश्टर स्केलवर एक ते तीन यादरम्यान धक्के बसणाºया गावांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीखालच्या मातीचे परीक्षण तसेच भूगर्भातील पाण्याचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्याचा आधार घेऊनच पुढील उपाययोजना केली जाणार असून, याकामी मेरीची मदत घेण्यात येणार आहे.व्याप्ती वाढू लागल्याने चिंताभूकंपाचे धक्के जाणवणारी गावे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे त्याचे गांभीर्य अधिक असून, यापूर्वी फक्त दळवट येथेच बसणाºया भूकंपाच्या धक्क्याची व्याप्ती वाढत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यासाठी दिल्लीतील तीन भूगर्भ शास्त्रज्ञ सलग दोन वर्षे कायमस्वरूपी नाशकात तळ ठोकून भूगर्भातील हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकEarthquakeभूकंप