शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

साडे तीन लाखांचा नाशिककरांनी लॉकडाऊनमध्ये भरला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:28 IST

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 193वर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे.तसेच शहरात देखील 11 कोरोनाग्रस्त आढळून आले

ठळक मुद्देपावणे चार हजार लोकांविरुद्ध गुन्हेलॉकडाऊनचे उल्लंघन, 2हजार दुचाकी जप्त

नाशिक : पोलीस आयुक्तांनी शहरात अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क चा वापर बंधनकारक केला आहे. मात्र बहुतांश लोक अद्यापही मास्क चा वापर करण्याकडे दुर्लक्ष करतात, अशा लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अद्याप तब्बल 426 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच मोटार वाहन कायदयानुसार विविध कलमांतर्गत कारवाई करून पोलिसांनी 3 लाख 49 हजार 600 रुपयांचा दंड नाशिककरांकडून लॉकडाऊन काळात वसूल केला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना एकूण दंड 17 लाख 94 हजार 800 रूपये इतका करण्यात आला आहे, त्यापैकी 14 लाख 45 हजार 200 रुपयांची वसुली शिल्लक आहे.

लॉकडाऊन लवकर संपवावा असे प्रत्येकालाच वाटते; मात्र अपवाद वगळता प्रामाणिकपणे किती लोक आपापल्या घरातच थांबतात? विनाकारण रस्त्यांवर येण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे, तरीदेखील अद्याप फारसे गांभीर्य नागरिकांत दिसून येत नाही. महिनभरात लॉक डाऊनला बाधा निर्माण करत जमावबंदी, संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 3 हजार 676 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.तसेच दररोज संशयित रुग्णही उपचारार्थ रुग्णालयात दाखल होत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 193वर पोहचला आहे. सर्वाधिक रुग्ण मालेगावमधील आहे.तसेच शहरात देखील 11 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीकरिता सकाळी 10 ते दुपारी 4 अशी वेळ निर्धारित केली गेली आहे. शहर पोलिसानी रस्त्यावर बॅरीकेड लावून कोणीही विनाकारण घराबाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे, अत्यावश्यक गरजेशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असे आवाहन सातत्याने पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे, मात्र नागरिक याकडे सपशेल दुर्लक्ष करून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी दहा ते चार दरम्यान भाजीपाला व किराणा दुकान सुरू ठेवण्याची मुदत असल्याने या कळात रस्त्यावर मोठी गर्दी होत आहे. ज्यांना काहीच सामान घ्यायचे नाही, अशा लोकांकडून विनाकारण गर्दी केली जात आहे. एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्य सर्रासपणे भाजीपाला, किराणा खरेदीसाठी बाहेर फिरताना आढळून येत आहेत, त्यामुळेच लॉक डाऊन चा फज्जा उडत आहे. 20 एप्रिल पासून लॉक डाऊन मध्ये काहीशी सूट काही ठराविक अस्थापनांना विविध नियम, अटींच्या अधीन राहून देण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा सर्वसामान्य लोकांकडून घेतला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, गस्त वाढविण्यात आली आहे. मात्र नागरिकांकडून आद्यपही फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 19 मार्च पासून अद्याप 1हजार 539 लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच 3 हजार 676 लोकांविरुद्ध भादंवि कलम 188नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

2 हजार दुचाकी जप्त

नागरिकांनी सर्रासपणे रस्त्यांवर दुचाकीने संचार करू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांकडून रस्ता बंदी करण्यात आली आहे. तरीदेखील नागरिक दुचाकी घेऊन विनाकारण रस्त्यावर येत असल्याने अशा लोकांच्या दुचाकी पुढील 3 महिन्यांसाठी जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अद्याप 1 हजार 950 दुचाकी आयुक्तालयाच्या हद्दीत जप्त केल्या गेल्या आहेत.

 

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtraffic policeवाहतूक पोलीस