नाशिकरोड - गेल्या निवडणुकीत नाशिक महापालिकेत ६६ नगरसेवक निवडून आले असतानासुद्धा भाजपला इतर सर्वच पक्षांतील नगरसेवक घेण्याची गरज का पडली? असा प्रश्न उपस्थित करत भाजपला सत्तेची व महाराष्ट्र गिळंकृत करण्याची भयानक भूक लागली असल्याचा हल्लाबोल उद्धवसेनेचे नेते व युता सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला.
विहितगाव येथे उद्धवसेना व मनसे यांच्या आयोजित संवाद मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्रामध्ये गेल्या ११ वर्षांपासून बहुमतांनी सत्तेत असलेल्या भाजपने 'अच्छे दिन' आणले का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित करीत एकसुद्धा स्वप्न पूर्ण केल्याचे त्यांनी सांगावे, असे आव्हान दिले.
"भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच डागी लोकांना पक्षात घेऊन आपल्या भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ केल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. जात-पात, धर्म, प्रांत असे वादविवाद लावून जातिधर्माचे राजकारण करणाऱ्या भाजपने मुद्दयाचे बोलावे, असे ठाकरे म्हणाले. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, मनसेचे उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे आदी उपस्थित होते.
Web Summary : Aaditya Thackeray questions BJP's need to poach corporators despite having 66 elected members. He accuses BJP of corruption, power hunger, and divisive politics, challenging them to showcase their achievements in the last 11 years.
Web Summary : आदित्य ठाकरे ने भाजपा पर 66 पार्षद होने के बावजूद अन्य दलों के पार्षदों को लेने की आवश्यकता पर सवाल उठाया। उन्होंने भाजपा पर भ्रष्टाचार, सत्ता की भूख और विभाजनकारी राजनीति का आरोप लगाया, और पिछले 11 वर्षों में उनकी उपलब्धियों को दिखाने की चुनौती दी।