शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नाशिक सकल जैन समाजासाठी ‘ती’ पर्वणीच... : मुनिश्री तरुणसागरजींचा मोठा सहवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:24 IST

नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती. तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते

ठळक मुद्देत्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच

नाशिक: जैन समाजाचे धर्मगुरू  राष्ट्रसंत  क्रांतिकारी मुनिश्री तरुणसागरजी महाराज यांच्या निधनाने संपूर्ण जैन समाजासह देशाची हानी झाली आहे. ते ५४ वर्षांचे होते. नाशिक आणि तरुणसागरजी महाराज यांचा मोठा संबंध आहे. २००४ साली चातुर्मास सत्संगानिमित्त तरुणसागरजींचा सहवास येथील सकल जैन समाजाला सुमारे पाच महिने लाभला होता. सकल नाशिक जैन समाजाच्या निमंत्रणाला मान देऊन तरुणसागरजी महाराज त्यावेळी चातुर्मास सत्संगाला उपस्थित राहिले होते. त्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव, म्हसरुळ येथील गजपंथ मंदिरात झालेले विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणसागरजी यांनी आपल्या प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच आहे. नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती.

मुनिश्री तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते. त्यांच्या येण्याने संपुर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी चातुर्मासनिमित्ताने रविवार कारंजा चौकात विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तरुणसागरजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले होते, ‘मी कुठलीही धार्मिक कथा सांगायला आलो नाही तर तुमच्या जीवनाची व्यथा सांगायला आलो आहे’ समाजबांधवांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. यावेळी त्यांनी आनंदी जीवन जगण्याचा मार्ग सांगताना हरविलेल्या हास्यावर प्रकश टाकत ‘आज मानवाच्या चेहऱ्यावरील हास्य असे गायब झाले आहे, जसे निवडणूकानंतर पुढारी गायब होतात’ असे सोदाहरण सांगितले होते. दरम्यान, डोंगरे वसतीगृह मैदानावर २१ दिवसीय प्रेरणा महोत्सव पार पडला होता. यावेळी तरुणसागरजी यांनी विविध विषयांवर २१ दिवस नाशिककरांना मार्गदर्शन केले होते. या महोत्सवात तरुणसागरजी यांनी दुखीतांचे अश्रू पुसणे हीच ईश्वरपूजा, साधु-संतांमधील सुसंवाद राष्टसाठी उपकारक, माता-महात्मा अन् परमात्मा हेच सर्वश्रेष्ठ, मातृ-पितृ अतिथि देवोभव: ही भारतीय संस्कृती अशा विविध विषयांवर प्रवचनातून प्रकाश टाकल्याची माहिती राजेंद्र पहाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नाशिककरांच्या वतीने सन्मानगोदाकाठावर नाशिककरांच्या वतीने महापालिके कडून कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तरुणसागरजी महाराज, प्रतिकसागरजी महाराज यांचा अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या क टु प्रवचनाने नाशिककरांची मने जींकली होती.-- 

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरNashikनाशिक