शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

नाशिक सकल जैन समाजासाठी ‘ती’ पर्वणीच... : मुनिश्री तरुणसागरजींचा मोठा सहवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:24 IST

नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती. तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते

ठळक मुद्देत्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच

नाशिक: जैन समाजाचे धर्मगुरू  राष्ट्रसंत  क्रांतिकारी मुनिश्री तरुणसागरजी महाराज यांच्या निधनाने संपूर्ण जैन समाजासह देशाची हानी झाली आहे. ते ५४ वर्षांचे होते. नाशिक आणि तरुणसागरजी महाराज यांचा मोठा संबंध आहे. २००४ साली चातुर्मास सत्संगानिमित्त तरुणसागरजींचा सहवास येथील सकल जैन समाजाला सुमारे पाच महिने लाभला होता. सकल नाशिक जैन समाजाच्या निमंत्रणाला मान देऊन तरुणसागरजी महाराज त्यावेळी चातुर्मास सत्संगाला उपस्थित राहिले होते. त्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव, म्हसरुळ येथील गजपंथ मंदिरात झालेले विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणसागरजी यांनी आपल्या प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच आहे. नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती.

मुनिश्री तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते. त्यांच्या येण्याने संपुर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी चातुर्मासनिमित्ताने रविवार कारंजा चौकात विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तरुणसागरजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले होते, ‘मी कुठलीही धार्मिक कथा सांगायला आलो नाही तर तुमच्या जीवनाची व्यथा सांगायला आलो आहे’ समाजबांधवांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. यावेळी त्यांनी आनंदी जीवन जगण्याचा मार्ग सांगताना हरविलेल्या हास्यावर प्रकश टाकत ‘आज मानवाच्या चेहऱ्यावरील हास्य असे गायब झाले आहे, जसे निवडणूकानंतर पुढारी गायब होतात’ असे सोदाहरण सांगितले होते. दरम्यान, डोंगरे वसतीगृह मैदानावर २१ दिवसीय प्रेरणा महोत्सव पार पडला होता. यावेळी तरुणसागरजी यांनी विविध विषयांवर २१ दिवस नाशिककरांना मार्गदर्शन केले होते. या महोत्सवात तरुणसागरजी यांनी दुखीतांचे अश्रू पुसणे हीच ईश्वरपूजा, साधु-संतांमधील सुसंवाद राष्टसाठी उपकारक, माता-महात्मा अन् परमात्मा हेच सर्वश्रेष्ठ, मातृ-पितृ अतिथि देवोभव: ही भारतीय संस्कृती अशा विविध विषयांवर प्रवचनातून प्रकाश टाकल्याची माहिती राजेंद्र पहाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नाशिककरांच्या वतीने सन्मानगोदाकाठावर नाशिककरांच्या वतीने महापालिके कडून कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तरुणसागरजी महाराज, प्रतिकसागरजी महाराज यांचा अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या क टु प्रवचनाने नाशिककरांची मने जींकली होती.-- 

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरNashikनाशिक