शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नाशिक सकल जैन समाजासाठी ‘ती’ पर्वणीच... : मुनिश्री तरुणसागरजींचा मोठा सहवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 18:24 IST

नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती. तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते

ठळक मुद्देत्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच

नाशिक: जैन समाजाचे धर्मगुरू  राष्ट्रसंत  क्रांतिकारी मुनिश्री तरुणसागरजी महाराज यांच्या निधनाने संपूर्ण जैन समाजासह देशाची हानी झाली आहे. ते ५४ वर्षांचे होते. नाशिक आणि तरुणसागरजी महाराज यांचा मोठा संबंध आहे. २००४ साली चातुर्मास सत्संगानिमित्त तरुणसागरजींचा सहवास येथील सकल जैन समाजाला सुमारे पाच महिने लाभला होता. सकल नाशिक जैन समाजाच्या निमंत्रणाला मान देऊन तरुणसागरजी महाराज त्यावेळी चातुर्मास सत्संगाला उपस्थित राहिले होते. त्यांची विराट धर्म सभा, २१ दिवसांचा प्रेरणा महोत्सव, म्हसरुळ येथील गजपंथ मंदिरात झालेले विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून तरुणसागरजी यांनी आपल्या प्रवचनातून दिलेली शिकवण नाशिककरांसाठी अविस्मरणीयच आहे. नाशिककर जैन समाजबांधवांसाठी मुनिश्री तरुणसागरजींचा नाशकात मुक्काम ही पर्वणीच ठरली होती.

मुनिश्री तरुणसागरजी महाराज हे परखड व कटू प्रवचनासाठी प्रसिध्द होते. ४ जुलै २००४साली तरुणसागरजींचे नाशिक कुंभनगरीत आगमन झाले होते. त्यांच्या येण्याने संपुर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी चातुर्मासनिमित्ताने रविवार कारंजा चौकात विराट धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तरुणसागरजी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले होते, ‘मी कुठलीही धार्मिक कथा सांगायला आलो नाही तर तुमच्या जीवनाची व्यथा सांगायला आलो आहे’ समाजबांधवांची मोठी उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. यावेळी त्यांनी आनंदी जीवन जगण्याचा मार्ग सांगताना हरविलेल्या हास्यावर प्रकश टाकत ‘आज मानवाच्या चेहऱ्यावरील हास्य असे गायब झाले आहे, जसे निवडणूकानंतर पुढारी गायब होतात’ असे सोदाहरण सांगितले होते. दरम्यान, डोंगरे वसतीगृह मैदानावर २१ दिवसीय प्रेरणा महोत्सव पार पडला होता. यावेळी तरुणसागरजी यांनी विविध विषयांवर २१ दिवस नाशिककरांना मार्गदर्शन केले होते. या महोत्सवात तरुणसागरजी यांनी दुखीतांचे अश्रू पुसणे हीच ईश्वरपूजा, साधु-संतांमधील सुसंवाद राष्टसाठी उपकारक, माता-महात्मा अन् परमात्मा हेच सर्वश्रेष्ठ, मातृ-पितृ अतिथि देवोभव: ही भारतीय संस्कृती अशा विविध विषयांवर प्रवचनातून प्रकाश टाकल्याची माहिती राजेंद्र पहाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.नाशिककरांच्या वतीने सन्मानगोदाकाठावर नाशिककरांच्या वतीने महापालिके कडून कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी तरुणसागरजी महाराज, प्रतिकसागरजी महाराज यांचा अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. यावेळी त्यांनी आपल्या क टु प्रवचनाने नाशिककरांची मने जींकली होती.-- 

टॅग्स :Tarun Sagarतरुण सागरNashikनाशिक