शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Nashik: 'मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही', मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले

By suyog.joshi | Updated: October 9, 2023 11:21 IST

Nashik: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई कायम राहील. आरक्षणाचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे आंदोलन शांततेत होईल.

- सुयोग जोशी नाशिक - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मी मरेपर्यंत हटणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई कायम राहील. आरक्षणाचा आनंद चेहऱ्यावर पाहिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हे आंदोलन शांततेत होईल. आरक्षणासाठी ही पहिली आणि शेवटची लढाई आहे. आरक्षणासाठी राज्य शासनाशी बोलायला मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी येथे केले. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (दि.८) रात्री उशिरा शहरातील सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

जरांगे पाटील यांचे टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते मशाल पेटविण्यात आली. प्रास्ताविक राम खुर्दळ यांनी केले. गेल्या २५ दिवसांपासून साखळी उपोषणास बसलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा जरांगे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील बागुल, हरिभाऊ शेवाळे, संजय चव्हाण, संदीप बर्वे, नाना बच्छाव, योगेश नारकर उपस्थित होते.

समाज बांधवांचा उत्साहरात्री उशिरापर्यंत समाजातील बांधव, महिला तसेच बालक जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते, यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मी मराठा मी कुणबी अशा घोषणा दिल्या. 

१४ तारखेला उपस्थित राहावेमराठा समाजाकडून यापूर्वी एक मराठा अशी घोषणा दिली जात होती. त्याच्यासोबत आता जरांगे पाटील यांच्यासाठी एक मराठा ग्रेट मराठा अशी घोषणा देण्यात आली. दरम्यान, १४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटीत सभेला आपल्या कुटुंबास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.

नोकरीसाठी हवे आरक्षणजरांगे पाटील म्हणाले 'मराठा आरक्षणाची लढाई २९ ऑगस्टला अंतरवेलीत सुरू झाली. तिसऱ्या दिवशी महिलांवर हल्ला. त्यांची डोके फोडण्यात आली. ज्या देशात लोकशाही, कायद्याला मानले जाते तेथे आपल्याला कुणी मारहाण करेल असा विचारही कोण्या माउलीने केला नव्हता. मराठा समाजाचे नेमके काय चुकले की, असा प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्ला संपूर्ण मराठा समाजावर होता. नाशिकने या आंदोलनाला वेगळी दिशा दिली आहे. आम्हाला धिंगाणा महामार्गावरही करता आला असता. मला खुर्चीचा मोह नाही. नोकरीसाठी आम्हाला आरक्षण हवे आहे. आम्ही आमचा हक्क मागत आहोत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठाMaharashtraमहाराष्ट्रNashikनाशिक