शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ठाणे वर्षा मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकच्या कन्यांचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 2:17 AM

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या मुलींनी सलग अकराव्या वर्षी बाजी मारत पुन्हा नवीन दशकातही वर्चस्व कायम राखण्याचे संकेत दिले. २१ किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉन गटात नाशिकच्या आरती पाटीलने, तर दहा किलोमीटर गटात कोमल जगदाळे हिने अव्वलस्थान पटकावत ठाणे मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकचा झेंडा फडकावला.

ठळक मुद्देआरती पाटील, कोमल जगदाळे आपापल्या गटात अव्वल

नाशिक : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत नाशिकच्या मुलींनी सलग अकराव्या वर्षी बाजी मारत पुन्हा नवीन दशकातही वर्चस्व कायम राखण्याचे संकेत दिले. २१ किलोमीटरच्या अर्धमॅरेथॉन गटात नाशिकच्या आरती पाटीलने, तर दहा किलोमीटर गटात कोमल जगदाळे हिने अव्वलस्थान पटकावत ठाणे मॅरेथॉनवर पुन्हा नाशिकचा झेंडा फडकावला.नाशिकच्या आरतीने २१ किलोमीटरचे हे अंतर १ तास २७ मिनिटे आणि ४७ सेकंदांत पूर्ण केले. आरतीने प्रारंभापासून घेतलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखत मोठ्या अंतरासह महिलांच्या अर्धमॅरेथॉनचे विजेतेपद पटकावले. द्वितीय स्थानी आलेल्या प्राजक्ता गोडबोलेने १ तास २८ मिनिटे २५ सेकंदांची वेळ दिली होती, तर कोमलने १० किलोमीटरची शर्यत ३७ मिनिटे ५५ सेकंदांत पूर्ण केली, तर नागपूरच्या निकिता राऊतने द्वितीय क्रमांक पटकावतांना ३८ मिनिटे ३२ सेकंद अशी वेळ दिली.भोसलाची ११व्यांदा बाजीअर्धमॅरेथॉनमध्ये बाजी मारणारी आरती ही नाशिकच्या भोसला सैनिकी स्कूलची विद्यार्थिनी असून, विजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते. सर्वप्रथम २००७ साली नाशिकच्या कविता राऊतने ठाणे वर्षा मॅरेथॉन जिंकत या मॅरेथॉनवरील नाशिकच्या वर्चस्वाला प्रारंभ केला होता. त्यानंतर कविताने सलग चार वर्षे ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर मोनिका आथरे, नंतर संजीवनी जाधव, पूनम सोनवणे आणि यंदा आरती पाटीलने बाजी मारत ११व्यांदा ही शर्यत जिंकून नाशिकचे ठाणे मॅरेथॉनवरील वर्चस्व कायम राखले आहे. केवळ गतवर्षी याच काळात विद्यापीठाची स्पर्धा असल्याने नाशिकच्या महिला धावपटू ठाणे मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या नव्हत्या.

टॅग्स :NashikनाशिकMarathonमॅरेथॉन