पाणीपुरवठा योजनांकडे १७ कोटींचे विजबील थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 17:05 IST2018-02-04T17:01:41+5:302018-02-04T17:05:04+5:30
³ffdVfIY: ³ffdVfIY ´fdS¸fÔOTf°fe»f wqu ´ff¯fe´fbSUNf ¹ffZþ³ffÔIYOZ rw IYfZMe xz »ff£f ÷ ´f¹ffÔ¨fZ U ´fd±fý½¹ffÔ¨¹ff

पाणीपुरवठा योजनांकडे १७ कोटींचे विजबील थकीत
नाशिक : नाशिक परिमंडळातील ६०४ पाणीपुरवठा योजनांकडे १६ कोटी ७९ लाख रु पयांचे व पथिदव्यांच्या १२० ग्राहकांकडे ३ कोटी ८८ लाख रु पये वीजबिल थकीत आहे. संबंधित ग्राहकांनी थकीत बिलांचा तातडीने भरणा करून भविष्यातील कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
नाशिक परिमंडळात मोठया प्रमाणात असलेल्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून ग्राहकांना बील भरण्याचे आवाहन केले जात आहे. संबंधित ग्राहकांकडून वसुलीसाठी मोहिम राबवूनही अपेक्षित प्रतिसाद मिलत नसल्याने आगामी काळात मोठी कारवाई करण्याचा इशारा महावितररने दिला आहे.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील १७६७ पाणीपुरवठा योजनांना व पथिदव्यांसाठी ग्रामपंचायती वगळून १४१ स्थानिक स्वराज्य संस्थांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा योजनांच्या एकूण ग्राहकांपैकी जवळपास ३५ टक्के ग्राहकांनी (६०४ योजना) गेल्या तीन महिन्यांपासून एकदाही वीजिबलाची रक्कम भरलेली नाही. या सर्वच योजनांकडे थकीत असलेले बिल दहा हजार रूपयांपेक्षा अधिकचे आहे. तर पथिदव्यांच्या एकूण ग्राहकांपैकी तब्बल ८५ टक्के ग्राहकांनी वीजिबलाची रक्कम थकवली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वीजिबल न भरलेल्या व दहा हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या ग्राहकांची ही आकडेवारी आहे.
पाणीपुरवठा योजना व पथिदव्यांच्या वीजिबल थकबाकीदारांच्या वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलाचा तातडीने भरणा करून अखंडित सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी केले आहे.