शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

नाशिक जिल्ह्यात ११ ठिकाणी कांदा व्यापाऱ्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 13:23 IST

लासलगाव (नाशिक)- ५०० टन कांदा साठवणूकीच्या मर्यादेबाबत उल्लंघन झालेले आहे की काय याबाबत आज केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काम करणा-या विशेष पथकाने लासलगाव येथील चार मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी पथके एकाचवेळी दाखल झाली आहेत.

लासलगाव (नाशिक)- ५०० टन कांदा साठवणूकीच्या मर्यादेबाबत उल्लंघन झालेले आहे की काय याबाबत आज केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काम करणा-या विशेष पथकाने लासलगाव येथील चार मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी पथके एकाचवेळी दाखल झाली आहेत. अशाच प्रकारच्या नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या कांदा व्यापाºयांवर ११ ठिंकाणी धाडी टाकण्यात आल्याचे समजते. देशभरात कांद्याचा साठा संपूष्टात आला आहे. त्यामुळे नफाखोरीच्या उद्देशाने निर्बंध असतानाही व्यापाºयांकडून अतिरिक्त साठा केला आहे की काय, याची पडताळणी करण्यासाठी ही पथके आल्याचे समजते. यावाबत अधिकाºयांशी विचारणा केली असता त्यांंनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. --------------कांद्याच्या चढ्या दराचा परिणामदेशातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर चढेच राहिल्यामुळे महानगरांमध्ये कांद्याचे प्रतिकिलो दर शंभर रु पयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने १५ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या काळात देशात १ लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमटीसी कंपनीला कांदा आयातीचे निर्देश दिले असून, त्या कांंद्याच्या वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपवली आहे. राज्यातील कांदा नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाला मॉन्सूनोत्तर पावसाचा मोठा फटका बसला असून, कांदा उत्पादकांनात मोठी तुट होण्याची शक्यता आहे . जिल्ह्यात ५३ हजार ६७२ हेक्टर क्षेत्रावर झालेल्या लागवडीपैकी तब्बल १७ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सादर केला आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शेतकरी आणि अभ्यासकांचे मत आहे. चांदवड, येवला, सिन्नर, निफाड तसेच कसमादे पट्टयातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा भागांतील कांदा उत्पादनात देखील घट येणार आहे. अवकाळी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा साडेसतरा हजार हेक्टर क्षेत्राला बसला आहे. कांद्याच्या लागवडी बाधित झाल्याची स्थिती निम्म्यापेक्षा अधिक असल्याचे कांदा उत्पादक व अभ्यासकांचे म्हणणे आहे. यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाले त्यात नंतर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांनी तयार केलेली रोपे खराब झाली. शेतकºयांनी पुन्हा कांद्याची रोपे तयार करून लागवडी केल्या. या लागवडीचे देखील नुकसान झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक