शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नाशिक-औरंगाबाद महामार्ग काही काळ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 6:00 PM

निफाड : निफाड व परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड ते शिवरेफाटा या दरम्यान बर्याच भागात पाणी साचल्याने वाहतूक एक तास ठप्प झाली होती.

ठळक मुद्देनिफाड परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्यानेवाहतुकविस्कळीत

निफाड : निफाड व परिसराला मुसळधार पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते तर शेतांमध्ये प्रचंड पाणी साठल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होणार आहे. मुसळधार पावसाने झोडपल्याने नाशिक औरंगाबाद महामार्गावर निफाड ते शिवरेफाटा या दरम्यान बर्याच भागात पाणी साचल्याने वाहतूक एक तास ठप्प झाली होती.बुधवारी (दि. ५) सायंकाळी साडेसहा ते ८ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाड येथील शांतीनगर चौफुली ते आचोळा नाला, शिवरे फाटा या दरम्यान बऱ्याच भागात अक्षरश: वाहणारी नदी वाटावी इतके पाणी रस्त्यावर आल्याने मगामार्ग गडप झाला होता. त्यामुळे या मार्गावर सुमारे १ तास वाहतूक विस्कळीत झाली होती.या रस्त्यावर साठलेल्या पाण्यातून वाट काढताना तीन ते चार मोटरसायकलस्वार खाली पाण्यात पडले. चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या काहींना हा मार्ग एक तास बंद झाल्यामुळे २० ते २५ कि.मी. चा फेरा करून वाहनधारकांना लासलगाव मनमाड जावे लागले.नाशिक औरंगाबाद महामार्गावरील निफाड येथील शांतीनगर चौफुली ते शिवरें फाटा या ३ किमी अंतराच्या दरम्यान पावसाचे पाणी तुडुंब भरून रस्त्यावर साचल्याने महामार्गावरील वाहतूक दरवर्षी विस्कळीत होत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या( बी ओ टी) दुर्लक्षामुळे हि समस्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहे.निफाड येथील शांतीनगर त्रिफुली ते नैताळे या दरम्यान या महामार्गावर चौपदरीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बी ओ टी विभागाने पाणी काढण्यासाठी गटार व चेंबरच तयार केलेले नाही. अर्धा तास जरी पाऊस झाला तरी उजव्या बाजूच्या रस्ता दुभाजकावरून पाणी डाव्या बाजूला जाते आणि हा महामार्ग जलमय होऊन जातो आणि वाहतूक ठप्प होत असते पूर्वी नैसर्गिक पाण्याचा स्तोत वाहून जाणारे ओढे, नाले गडप झाल्याने हे पाणी रस्त्यावर साचून राहते, त्यामुळे हा रस्ता खचून खराब होतो.या मुसळधार पावसाने निफाड, जळगांव व परिसरातील गावांतील शेतांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीRainपाऊस