शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मनपा हटविणार स्वत:चे आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:37 IST

महापालिकेच्या दोन वर्षांपूर्वीच् या विकास आराखड्यात दर्शविलेले पाणीपुरवठा विभागाच्या कामासाठी असलेले आपलेच आरक्षण हटविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी महासभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रानजीक असलेले आरक्षण हटविण्यासाठी महापालिकेने शुक्रवारी (दि.१५) अधिसूचना काढली आहे.

नाशिक : महापालिकेच्या दोन वर्षांपूर्वीच्या विकास आराखड्यात दर्शविलेले पाणीपुरवठा विभागाच्या कामासाठी असलेले आपलेच आरक्षण हटविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी महासभेत मंजूर केलेल्या ठरावानुसार बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रानजीक असलेले आरक्षण हटविण्यासाठी महापालिकेने शुक्रवारी (दि.१५) अधिसूचना काढली आहे.महापालिकेच्या २०१७ मध्ये मंजूर झालेल्या विकास आराखड्यात मौजे नाशिक शिवारात बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रानजीक हे आरक्षण ठेवण्यात आले होते. सिद्धार्थनगर झोपडपट्टीच्या समोर हा भूखंड आहे. यापूर्वी त्यावर महाराष्टÑ पोलीस अकादमीचे आरक्षण होते आणि आताही ते कायम असले तरी त्यातील काही क्षेत्र हे महापालिकेसाठी आरक्षित केले होते. शहरासाठी लागणाऱ्या दीर्घकालीन पाणीपुरवठा योजनेसाठी या जागेवर आरक्षण ठेवण्यात आले होते. मात्र महाराष्ट पोलीस अकादमीला त्याची कल्पना नव्हतीच, परंतु शहर विकास आराखड्याचे प्रारूप प्रसिद्ध केल्यानंतर आपल्या मिळकतीला धक्का बसतो आहे किंवा काय हे पाहण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. त्यामुळे आराखडा मंजूर झाला. परंतु त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याने अकादमीने आपला विस्तारीत प्रकल्प राबविण्यासाठी या जागेवरच इमारत बांधायचे ठरवले. त्यासाठी महाराष्टÑ पोलीस हाउसिंगने निविदा मागवल्या आणि बांधकाम नकाशे मंजुरीसाठी महापालिकेत पाठविले तेथे हा प्रकार उघड झाला.यानंतर नगरविकास आणि गृहखाते मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने त्यांनी मात्र अकादमीच्या बाजूनेच झुकते माप दिले आणि महापालिकेने लोकांच्या सुविधेसाठी असलेले आरक्षण हटविण्याची तयारी केली. हा प्रस्ताव मंजूर झाला असून, आता आरक्षण हटविण्यापूर्वी नागरिकांना हरकती आणि सूचना घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक