शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मनपाच्या शहर बससेवेचा आज फैसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:27 IST

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शहर बस वाहतूक ताब्यात घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बुधवारी (दि. १८) विशेष महासभेत फैसला होणार आहे. खासगीकरणातून ठेकेदारामार्फत सेवा चालविण्यास देताना आयुक्तांनी परिवहन समितीची तरतूद न केल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्याने आता बससेवेचा मार्ग जवळ जवळ मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा परिवहन सेवेला हिरवा कंदीलविरोधी पक्ष मात्र भूमिकेवर ठाम

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शहर बस वाहतूक ताब्यात घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बुधवारी (दि. १८) विशेष महासभेत फैसला होणार आहे. खासगीकरणातून ठेकेदारामार्फत सेवा चालविण्यास देताना आयुक्तांनी परिवहन समितीची तरतूद न केल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्याने आता बससेवेचा मार्ग जवळ जवळ मोकळा झाला आहे. तथापि, महापालिकेकडे पैसे नाही म्हणून नागरिकांवर कर लादणाºया प्रशासनाकडून नसलेली जबाबदारी घेण्यास विरोधी पक्षांनी मात्र विरोध कायम ठेवला आहे.गेल्या पाच वेळा महापालिकेने बससेवेचा प्रस्ताव फेटाळला असताना यंदा सहाव्यांदा हा प्रस्ताव राज्य सरकारच्याच स्वारस्यातून मांडला जात आहे. महापालिकेत भाजपाची पूर्ण सत्ता असल्याने हा प्रस्ताव मंजूर होणे जवळपास अटळ आहे. मात्र, यासंदर्भात परिवहन समितीचा समावेश भाजपा करणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केलेल्या बससेवेच्या प्रस्तावात परिवहन समितीची तरतूद नसून त्यामुळे सोमवारी (दि. १८) भाजपाच्या पक्ष बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यामुळे आयुक्त मुंढे यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यांनी परिवहन समितीस नकार दिल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी सकाळी भेट घेण्याचे ठरले होते. त्यानुसार शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्या नेतृत्वाखाली उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेता दिनकर पाटील, गटनेता संभाजी मोरूस्कर तसेच भगवान दोंदे, पंडित आवारे, सुनीता पिंगळे, जगदीश पाटील, अनिल भालेराव यांनी सकाळी मुंबई गाठून पालकमंत्र्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करा असे सांगून संबंधिताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीबससेवेचा प्रस्ताव जर नियमात बसत असेल आणि अन्य महापालिकांमध्ये अशाच प्रकारची तरतूद असेल तर तसा निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद शिवारात नगररचना योजना राबविण्यास शेतकºयांचा विरोध असल्याचे सानप आणि अन्य पदाधिकाºयांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांची समजूत काढावी व ते शक्य न झाल्यास पर्यायी जागा शोधावी, असा सल्ला दिला. त्यामुळे आता बुधवारी होणाºया सभेत बससेवा सुरू करण्याचा फैसला होण्याची शक्यता आहे.विरोधकांचा विरोध कायममहापालिकेतील विरोधी पक्षांनी शहर बस वाहतुकीच्या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या बससेवेत अनेक त्रुटी असून, या दूर करून प्रस्ताव सादर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. बससेवेच्या बाबतीत आयुक्तांचा प्रस्ताव दोषपूर्ण आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत, त्याचबरोबर खासगीकरणाचे महापालिकेचे अनुभव अत्यंत वाईट आहेत. खत प्रकल्पापासून घंटागाडीपर्यंत अनेकदा महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला असताना अशाप्रकारची सेवा राबविणे गैर असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.सभागृह नेते पाटील नाराजचपालकमंत्री गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटीविषयी पुरेशी कल्पना नसल्याचे सांगून महापालिका पदाधिकाºयांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास सांगितल्याने सभागृह नेते दिनकर पाटील हे फडणवीस यांना भेटण्यास न जाताच परतले. महाजन यांना भेटण्यासाठी जाणाºया शिष्टमंडळात आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, विजय साने, लक्ष्मण सावजी या कोअर कमिटी सदस्यांनी जाणे टाळले त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांना पत्र दिले असून, त्यात भाजपाचे तिन्ही आमदार आपसात वाद करतात, तसेच त्यांच्या वादामुळेच शहरातील करवाढ पूर्ण रद्द झालेली नाही. शेतकरी यामुळेच भरडला जाणार आहे. त्यामुळे आपला या प्रस्तावास विरोध आहे, तसेच आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री