शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मुंबई-आग्रा महामार्ग : वाहनचालक-पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:22 IST

उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दोन वर्ष उलटले आहे; मात्र या दीड किलोमीटर अंतरावरील उड्डाणपूलाच्या कामाला प्राधिकरणाला ‘मुहूर्त’ लाभलेला नाही.

ठळक मुद्देउड्डाणपूल मंजूर करण्यात आला; मात्र तो अद्याप कागदोपत्रीच आहे.महामार्गाच्या दुतर्फा शाळा-महाविद्यालये आहेत.

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावरील चौफुल्यांवर वाहनधारकांसह पादचाºयांची जीवघेणी कसरत सुरूच आहे . महामार्गावर अनेकांचा बळी गेला असून बहुतांश लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के.के.वाघ महाविद्यालय ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दोन वर्ष उलटले आहे; मात्र या दीड किलोमीटर अंतरावरील उड्डाणपूलाच्या कामाला प्राधिकरणाला ‘मुहूर्त’ लाभलेला नाही.महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुलीवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असून रोज लहान मोठे अपघात घडतात .या अपघातांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. या उड्डाणपुलासाठी चौफुलीवर अनेक संघटनांसह, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केल्यानंतर सरकारकडून उड्डाणपूल मंजूर करण्यात आला; मात्र तो अद्याप कागदोपत्रीच आहे.उड्डाणपूलाचे भूमीपूजन थाटामाटात करण्यात आले; मात्र प्रत्यक्षरित्या कामाला सुरूवात झाली नाही, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन अद्याप किती बळी जाण्याची प्रतीक्षा करत आहे? असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे. महामार्ग ओलांडताना शाळकरी मुलांसह ज्येष्ठ नागरिक व महिलांची तारंबळ उडते. या गोंधळात अनेकदा अपघात घडतात. तसेच महामार्गालगत कन्नमवार पुलापासून पुढे कोणार्कनगरपर्यंत महामार्गाच्या दुतर्फा शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांची वर्दळ असते.असे आहेत महामार्गाचे ‘ब्लॅक स्पॉट’महामार्गावर कन्नमार पुलाजवळ हिरे महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय असून येथून टकलेनगरकडे ये-जा करण्यासाठी हजारो विद्यार्थी दिवसभर रस्ता ओलांडतात. हा मोठा ब्लॅक स्पॉट आहे. तसेच तपोवन चौफुली, औरंगाबादनाका, अमृतधाम चौफुली, रासबिहारी चौफुली, जत्रा चौफुली, आडगाव येथील वैद्यकिय महाविद्यालय चौफूली, आडगाव ट्रक टर्मिनल चौफुली हे महामार्गावरील अत्यंत गंभीर असे ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकhighwayमहामार्गAccidentअपघात