शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वनसंवर्धनातून आदिवासींची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 12:45 IST

स्वावलंबी पाडे; नाशिक जिल्ह्यातील निंबारपाडा, देवगावने राखले बांबू वनछच्च्

- अझहर शेख नाशिक : जंगले टिकविली तर निसर्ग संवर्धन घडून येते; मात्र याच जंगलांमधून आर्थिक सुबत्तेचा मार्गही सापडतो, त्यासाठी गरज असते ती दुर्दम्य इच्छाशक्तीची. नाशिकच्या आदिवासी सुरगाणा तालुक्यातील निंबारपाडा, देवगावातील लोकांनी अशाच पद्धतीने जंगल संरक्षणातूनच समृद्धीचा मार्ग शोधला. वनविभागाच्या साथीने ही गावे आर्थिक समृद्धीकडे स्वावलंबी वाटचाल करीत आहेत.महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर सुरगाणा वनपरिक्षेत्रातील निंबारपाडा हे पार नदीच्या काठावर वसलेले आदिवासी दुर्गम गाव आहे. या पाड्याला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. नाशिक शहरापासून ९६ किलोमीटरवर असलेल्या या गावातील आदिवासी बांधवांनी नाशिक पूर्व वनविभागाच्या मदतीने सुमारे ७० हेक्टर वनजमिनीवर बांबूची लागवड व संवर्धन करीत विकासाचा मार्ग शोधला आहे. दोन वर्षांपूर्वीच या गावाने केवळ दहा हेक्टरवरील बांबूचे हार्वेस्टिंग करीत रोजगार तर मिळविला; मात्र बाजारात बांबूची विक्री करून सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्नही मिळविले होते. या गावात ९३.६५१ हेक्टरवर वनविभागाच्या अखत्यारीत राखीव वन आहे. साग, सादडा, बांबू, आपटा, पळसासारखी वृक्षसंपदा येथील वनात आढळते. ७६३ लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांनी आर्थिक सुबत्तेचा मार्ग जंगल संवर्धनातूनच जातो हे इतरांना पटवून दिले. संयुक्त वनव्यवस्थापन समितीत अध्यक्ष विठ्ठल धूम, पंडित बोरसे, कल्पना पाईकराव हे पदाधिकारी आहेत.

बांबू सुविधा केंद्र ठरणार मैलाचा दगडनिंबारपाड्याजवळच देवगावमध्ये वनविभागाकडून साकारण्यात आलेले बांबू कला सुविधा केंद्र सुरगाणा तालुक्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. देवगावमधील २० लोकांनी नुकतेच चंद्रपूरच्या बांबू रिसर्च-ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन प्रशिक्षण पूर्ण केले. हे केंद्र येत्या महिनाभरात सक्रिय होणार आहे.दहा हेक्टरवर बहरली श्रीघाटची काजू बाग नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट या १८० कुटुंबांच्या आदिवासी पाड्याने चक्क दहा हेक्टरवर काजू बाग फुलविली आहे. या ‘श्रीघाट काजू पार्क’मध्ये सुमारे दहा ते पंधरा वर्षे जुनी ३ हजार २३२ काजूची झाडे आहेत. गावाला दरवर्षी यामधून सरासरी दोन ते अडीच लाखांचे हंगामी उत्पन्न मिळते.

बांबूपासून आकर्षक वस्तूनिंबारपाड्यात वनजमिनीवर लागवड केलेल्या वृक्षांमध्ये २० टक्क्यांपर्यंत बांबू आहे. बांबूपासून बनविलेल्या आकर्षक शोभेच्या वस्तूंची पुणे, नाशिकसारख्या विविध प्रदर्शनांमध्ये येथील आदिवासींनी विक्रीदेखील केली आहे. - तुषार चव्हाण,उपवनसंरक्षक, नाशिक पूर्व

वनसंवर्धनाची ‘त्रिसूत्री’निंबारपाडावासीयांनी स्वयंप्रेरणेतून कुºहाडबंदी, चराईबंदी, शिकारबंदीया त्रिसूत्रीचा अवलंब करीत वनसंवर्धनावर भर दिला.त्यासाठी दररोज गावातून दोन माणसे गस्तीसाठी नेमली. चराईबंदी काटेकोरपणे अमलात आणली.यामुळे गावाला गवताच्या स्वरूपात चांगले वनउपज हाती आले. गवत कापून आणत गावकऱ्यांनी पशुधनाची भूक त्यांच्या गोठ्यातच भागविण्याचा नियम स्वत:ला घालून घेतला.

टॅग्स :environmentपर्यावरणNashikनाशिक