शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

वनसंवर्धनातून आदिवासींची आर्थिक समृद्धीकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 12:45 IST

स्वावलंबी पाडे; नाशिक जिल्ह्यातील निंबारपाडा, देवगावने राखले बांबू वनछच्च्

- अझहर शेख नाशिक : जंगले टिकविली तर निसर्ग संवर्धन घडून येते; मात्र याच जंगलांमधून आर्थिक सुबत्तेचा मार्गही सापडतो, त्यासाठी गरज असते ती दुर्दम्य इच्छाशक्तीची. नाशिकच्या आदिवासी सुरगाणा तालुक्यातील निंबारपाडा, देवगावातील लोकांनी अशाच पद्धतीने जंगल संरक्षणातूनच समृद्धीचा मार्ग शोधला. वनविभागाच्या साथीने ही गावे आर्थिक समृद्धीकडे स्वावलंबी वाटचाल करीत आहेत.महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर सुरगाणा वनपरिक्षेत्रातील निंबारपाडा हे पार नदीच्या काठावर वसलेले आदिवासी दुर्गम गाव आहे. या पाड्याला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. नाशिक शहरापासून ९६ किलोमीटरवर असलेल्या या गावातील आदिवासी बांधवांनी नाशिक पूर्व वनविभागाच्या मदतीने सुमारे ७० हेक्टर वनजमिनीवर बांबूची लागवड व संवर्धन करीत विकासाचा मार्ग शोधला आहे. दोन वर्षांपूर्वीच या गावाने केवळ दहा हेक्टरवरील बांबूचे हार्वेस्टिंग करीत रोजगार तर मिळविला; मात्र बाजारात बांबूची विक्री करून सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्नही मिळविले होते. या गावात ९३.६५१ हेक्टरवर वनविभागाच्या अखत्यारीत राखीव वन आहे. साग, सादडा, बांबू, आपटा, पळसासारखी वृक्षसंपदा येथील वनात आढळते. ७६३ लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांनी आर्थिक सुबत्तेचा मार्ग जंगल संवर्धनातूनच जातो हे इतरांना पटवून दिले. संयुक्त वनव्यवस्थापन समितीत अध्यक्ष विठ्ठल धूम, पंडित बोरसे, कल्पना पाईकराव हे पदाधिकारी आहेत.

बांबू सुविधा केंद्र ठरणार मैलाचा दगडनिंबारपाड्याजवळच देवगावमध्ये वनविभागाकडून साकारण्यात आलेले बांबू कला सुविधा केंद्र सुरगाणा तालुक्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. देवगावमधील २० लोकांनी नुकतेच चंद्रपूरच्या बांबू रिसर्च-ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊन प्रशिक्षण पूर्ण केले. हे केंद्र येत्या महिनाभरात सक्रिय होणार आहे.दहा हेक्टरवर बहरली श्रीघाटची काजू बाग नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट या १८० कुटुंबांच्या आदिवासी पाड्याने चक्क दहा हेक्टरवर काजू बाग फुलविली आहे. या ‘श्रीघाट काजू पार्क’मध्ये सुमारे दहा ते पंधरा वर्षे जुनी ३ हजार २३२ काजूची झाडे आहेत. गावाला दरवर्षी यामधून सरासरी दोन ते अडीच लाखांचे हंगामी उत्पन्न मिळते.

बांबूपासून आकर्षक वस्तूनिंबारपाड्यात वनजमिनीवर लागवड केलेल्या वृक्षांमध्ये २० टक्क्यांपर्यंत बांबू आहे. बांबूपासून बनविलेल्या आकर्षक शोभेच्या वस्तूंची पुणे, नाशिकसारख्या विविध प्रदर्शनांमध्ये येथील आदिवासींनी विक्रीदेखील केली आहे. - तुषार चव्हाण,उपवनसंरक्षक, नाशिक पूर्व

वनसंवर्धनाची ‘त्रिसूत्री’निंबारपाडावासीयांनी स्वयंप्रेरणेतून कुºहाडबंदी, चराईबंदी, शिकारबंदीया त्रिसूत्रीचा अवलंब करीत वनसंवर्धनावर भर दिला.त्यासाठी दररोज गावातून दोन माणसे गस्तीसाठी नेमली. चराईबंदी काटेकोरपणे अमलात आणली.यामुळे गावाला गवताच्या स्वरूपात चांगले वनउपज हाती आले. गवत कापून आणत गावकऱ्यांनी पशुधनाची भूक त्यांच्या गोठ्यातच भागविण्याचा नियम स्वत:ला घालून घेतला.

टॅग्स :environmentपर्यावरणNashikनाशिक