शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
2
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
3
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
4
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
5
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
6
राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 
7
नवी मुंबईतील शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
8
मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 
9
महामुंबईतील १९ आरएमसी प्लांट बंद, तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाखांची बँकहमी जप्त
10
महाडमध्ये दोन गटांतील राड्याप्रकरणी विकास गोगावलेंसह २० जणांवर गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल
11
इंडिगोची दोन्ही विमाने रद्द; १२ तास ताटकळले संभाजीनगरकर
12
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
13
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
14
IND vs SA Turning Point Of The Match : ती एक चूक नडली! यशस्वीमुळे टीम इंडिया ठरली अपयशी
15
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
16
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
17
IND vs SA : पंचांनी चेंडू बदलून दिला, पण... KL राहुलनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?   
18
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
19
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
20
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
Daily Top 2Weekly Top 5

मातोरी गावाची तहान भागविणारा पाझरतलाव कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:28 IST

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील रहिवाशांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ शहरानजीकच्या मातोरी गावालाही करावी लागत आहे.

मातोरी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे गाव-खेड्यातील रहिवाशांना पाण्यासाठी करावी लागणारी धावपळ शहरानजीकच्या मातोरी गावालाही करावी लागत आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेती विकासाला चालना देणारा व गावाची तहान भागविणारा पाझरतलाव कोरडाठाक पडल्याने शेतकऱ्यांना द्राक्षबागेवर कुºहाड चालविण्याची वेळ आली आहे.मातोरी गावाच्या समृद्धीला चालना देणारा विस्तीर्ण असा सुमारे चौदा एकर क्षेत्रात बनविण्यात आलेला पाझरतलाव सद्यस्थितीत कोरडाठाक पडला आहे. या पाझरतलावावर सुमारे सहासे ते सातशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असून, यामुळे साठलेल्या पाण्याने मोठा आधार होतो. तसेच गावातील गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांना पिण्यासाठी याच पाण्याचा वापर केला जातो, परंतु यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे तलावात एक थेंबही पाण्याचा राहिला नाही. विहिरीही कोरड्याठाक पडत पडत आहेत. जनावरे जगविण्याचे मोठे आव्हान बळीराजापुढे येऊन उभे ठाकले असून, या पाझरतलावाची क्षमता दोन गावाला जगवेल एवढी असतानादेखील त्याच्याकडे पहायला शासनाला वेळ नाही.शेतकºयांनी आशा सोडलीशेतकरी वर्ग अनेकदा आपले गाºहाणे जलसंपदा विभागाकडे घेऊन गेले, पण प्रत्येक विभागाने हा पाझरतलाव आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून त्यांची बोळवण केल्याने अखेर शेतकºयांनी आशा सोडून दिली. शासनाच्या पाणलोट विकासाचा फायदा झाला न कोणत्याही योजनेचा. पाझर तलावाच्या पालकत्वाचा मुद्दा जलसंपदा विभाग नाकारत असल्याने पाण्याची कमतरता कायम आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीDamधरण