शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नाशिकमध्ये पंधराशेहून अधिक प्राध्यपकांचे काम बंद आंदोलन ; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:44 IST

महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या बारा हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यासह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५)विविध महाविद्यालयांसमोर एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले. 

ठळक मुद्देनाशिकमध्ये प्राध्यपकांचे काम बंद आंदोलनपंधराशेहून अधिक प्राध्यपकांचा आंदोलनात सहभाग आरवायके, एचपीटीचे प्राध्यापक संपातून बाहेर

नाशिक : महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या बारा हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यासह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीनप्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५)विविध महाविद्यालयांसमोर एकत्र येऊन कामबंद आंदोलन केले. शहरातील केटीएचम, पंचवटी, के .व्ही. एन नाईक, भोसला महाविद्यालयांसग जिल्ह्यातील मालेगावची तीन वरिष्ठ महाविद्यालये देवळा, नामपूर, लासलगाव, चांदवड. वणी, सिन्नर, मनमाड, इगतपुरी अशा जिल्हाभरातील पंधराशेहून अधिक महाविद्यालयीन प्राध्यपकांनी या संपात मंगळवारपासून एमस्फुक्टो संघटनेने पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनात सक्रीय सहभाग सरकारविरोधात घोषणाबाजी केली. प्राध्यपकांच्या स्थानिक स्फुक्टो संघटनेतील सर्व प्राध्यापक सहभागी झाले असुन प्राध्यापकांनी पुकारलेल्या या संपाच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने प्राध्यापक भरती वरील बंदी उठवावी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे वेतन वाढवावे, जुनी पेन्शन योजना राबवावी, सातवा वेतन आयोग लागू करावा अशा मागण्या असल्याचे सिनेट सदस्य तथा स्फुक्टोचे उपाध्यक्ष डॉ.नंदू पवार यांनी सांगितले. तर गोखले एज्युकेशन सोसायटीच्यी बी वाय के महाविद्यालयाव्यतिरिक्त कोणत्याही महाविद्यालयांचे प्राध्यापक या संपात सहभाही झाले नसल्याचे दिसून आले. संबधित प्राध्यपाक ांशी संवाद साधून त्यांनाही संपता सहभाही होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आंदलनापूर्वीच कामबंद करण्याचा इशारा दिलेला असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शिक्षण संस्थांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सप्टेंबरपर्यंत वरिष्ठ महाविद्यालयांच्या विविध विद्याशाखांचा पहिल्या सत्रातील अभ्यासक्रम पूर्ण झालेला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचा दावा काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केला आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकProfessorप्राध्यापकuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी