शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

जिल्ह्यात महिनाभरात तब्बल १५०हून अधिक कोरोना बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:45 IST

जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१३वर पोहोचल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील मालेगाव आणि परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना नाशिक महानगरातील आणि त्यातही जुने नाशिक, वडाळागाव, पेठरोड, पंचवटी परिसरातील बाधितांच्या आणि मृतांच्या आकड्यात प्रचंड मोठी भर पडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमृत्यूचे तांडव : २५ मेपर्यंत जिल्ह्यात ५२ मृत्यूची होती नोंद; नाशिक महानगराची वाटचाल शंभरीकडे; मृत्यूसंख्या २१३वर

धनंजय रिसोडकर । नाशिक : जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यात एकही बळी गेलेला नव्हता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या८ तारखेला मालेगावला पहिल्या मृत्यूची नोंद झाली. मात्र, एप्रिलमध्ये नाशिक महानगरात एकही मृत्यू झाला नव्हता. नाशिकचा पहिला कोरोना बळी मे महिन्यात ५ तारखेला गेल्यापासून मात्र जिल्ह्यातील बळींच्या आकड्यात भर पडू लागली. तरीदेखील २५ मेपर्यंत जिल्ह्यातील बळींची संख्या ५२वर होती. मात्र, त्यानंतरच्या गत महिनाभरात १५०हून बळींची नोंद झाली असून, जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१३वर पोहोचल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील मालेगाव आणि परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना नाशिक महानगरातील आणि त्यातही जुने नाशिक, वडाळागाव, पेठरोड, पंचवटी परिसरातील बाधितांच्या आणि मृतांच्या आकड्यात प्रचंड मोठी भर पडल्याचे दिसून येतआहे.नाशिक जिल्ह्यात एप्रिलअखेरीस मृत्यूने दोन आकडी संख्या गाठली. त्यामुळे १ मेपर्यंत केवळ १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या पंधरा दिवसांत २१ने वाढ होऊन मृतांचा आकडा ३३पर्यंत पोहोचला. त्यानंतर २५ मेपर्यंत बळींचा आकडा पन्नाशी ओलांडत ५२ वर पोहोचला.मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच खऱ्या अर्थाने मृत्यूचे थैमान सुरू झाले असून, मे महिन्याच्या ३१ तारखेला हा आकडा थेट ७२वर पोहोचला. प्रामुख्याने नाशिक शहर आणि त्यातही जुने नाशिक आणि पंचवटी हे दाटीवाटीचे परिसर कोरोनाच्या केंद्रस्थानी आले आहेत.पहिले १०० बळी ६१ दिवसांत, पुढचे ११३ बळी १७ दिवसांतकोरोना बळी जाण्याचा जिल्ह्यातील प्रारंभ ८ एप्रिलला झाल्यानंतर पहिला १०० बळींचा टप्पा गाठण्यास तब्बल ९ जून उजाडला होता. म्हणजेच प्रारंभीचे १०० बळी होण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक तब्बल ६१ दिवस लागले होते, तर त्यानंतरचे ११३ बळी १० जूनपासून २७ जूनपर्यंतच्या अवघ्या १७ दिवसांच्या कालावधीत गेले आहेत. प्रारंभीच्या १०० बळींच्या तुलनेत मृत्यूदर तिपटीहून अधिक असल्याने आरोग्य यंत्रणा कमालीची हादरून गेली आहे.नाशिक महानगरात सर्वाधिक मृत्यू : आतापर्यंत गेलेल्या बळींमध्ये नाशिक महानगरात ९१, मालेगावमध्ये ७३, ग्रामीण भागात ३८ जणांचा तर जिल्ह्याबाहेरील ११ व्यक्तींचा समावेश आहे, तर आतापर्यंत गेलेल्या २१३ बळींमध्ये ७६ महिला आणि १३७ पुरुषांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू