शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जिल्ह्यात महिनाभरात तब्बल १५०हून अधिक कोरोना बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:45 IST

जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१३वर पोहोचल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील मालेगाव आणि परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना नाशिक महानगरातील आणि त्यातही जुने नाशिक, वडाळागाव, पेठरोड, पंचवटी परिसरातील बाधितांच्या आणि मृतांच्या आकड्यात प्रचंड मोठी भर पडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमृत्यूचे तांडव : २५ मेपर्यंत जिल्ह्यात ५२ मृत्यूची होती नोंद; नाशिक महानगराची वाटचाल शंभरीकडे; मृत्यूसंख्या २१३वर

धनंजय रिसोडकर । नाशिक : जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यात एकही बळी गेलेला नव्हता. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या८ तारखेला मालेगावला पहिल्या मृत्यूची नोंद झाली. मात्र, एप्रिलमध्ये नाशिक महानगरात एकही मृत्यू झाला नव्हता. नाशिकचा पहिला कोरोना बळी मे महिन्यात ५ तारखेला गेल्यापासून मात्र जिल्ह्यातील बळींच्या आकड्यात भर पडू लागली. तरीदेखील २५ मेपर्यंत जिल्ह्यातील बळींची संख्या ५२वर होती. मात्र, त्यानंतरच्या गत महिनाभरात १५०हून बळींची नोंद झाली असून, जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या २१३वर पोहोचल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे.मे महिन्याच्या उत्तरार्धापासून जिल्ह्यातील मालेगाव आणि परिसरातील कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना नाशिक महानगरातील आणि त्यातही जुने नाशिक, वडाळागाव, पेठरोड, पंचवटी परिसरातील बाधितांच्या आणि मृतांच्या आकड्यात प्रचंड मोठी भर पडल्याचे दिसून येतआहे.नाशिक जिल्ह्यात एप्रिलअखेरीस मृत्यूने दोन आकडी संख्या गाठली. त्यामुळे १ मेपर्यंत केवळ १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या पंधरा दिवसांत २१ने वाढ होऊन मृतांचा आकडा ३३पर्यंत पोहोचला. त्यानंतर २५ मेपर्यंत बळींचा आकडा पन्नाशी ओलांडत ५२ वर पोहोचला.मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासूनच खऱ्या अर्थाने मृत्यूचे थैमान सुरू झाले असून, मे महिन्याच्या ३१ तारखेला हा आकडा थेट ७२वर पोहोचला. प्रामुख्याने नाशिक शहर आणि त्यातही जुने नाशिक आणि पंचवटी हे दाटीवाटीचे परिसर कोरोनाच्या केंद्रस्थानी आले आहेत.पहिले १०० बळी ६१ दिवसांत, पुढचे ११३ बळी १७ दिवसांतकोरोना बळी जाण्याचा जिल्ह्यातील प्रारंभ ८ एप्रिलला झाल्यानंतर पहिला १०० बळींचा टप्पा गाठण्यास तब्बल ९ जून उजाडला होता. म्हणजेच प्रारंभीचे १०० बळी होण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक तब्बल ६१ दिवस लागले होते, तर त्यानंतरचे ११३ बळी १० जूनपासून २७ जूनपर्यंतच्या अवघ्या १७ दिवसांच्या कालावधीत गेले आहेत. प्रारंभीच्या १०० बळींच्या तुलनेत मृत्यूदर तिपटीहून अधिक असल्याने आरोग्य यंत्रणा कमालीची हादरून गेली आहे.नाशिक महानगरात सर्वाधिक मृत्यू : आतापर्यंत गेलेल्या बळींमध्ये नाशिक महानगरात ९१, मालेगावमध्ये ७३, ग्रामीण भागात ३८ जणांचा तर जिल्ह्याबाहेरील ११ व्यक्तींचा समावेश आहे, तर आतापर्यंत गेलेल्या २१३ बळींमध्ये ७६ महिला आणि १३७ पुरुषांचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू