शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

आई मला शाळेत जायचं नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST

नाशिक : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही ...

नाशिक : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू होणार आहेत. परंतु, जवळपास दहा महिन्यांपासून शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी विविध कारणांमुळे नकारघंटा सुरू असून सातवी, आठवीतील काही विद्यार्थी वगळता पाचवी सहावीचे विद्यार्थी मात्र ‘आई मला शाळेत जायचे नाही’ असा हट्ट करीत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाचा आलेख घसरल्याने ४ जानेवारीपासून जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून शाळेत येणारे विद्यार्थीही सुरक्षित आहेत. त्यामुळे आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व तयारीही केली आहे. मात्र, कोरोनाच्या सुुरुवातीच्या काळात मुलांनी घराबाहेर पडू नये, यासाठी आईवडिलांनींच मुलांना सांगितलेली बाहेर कोरोना आहेसारखी वाक्ये आता मुलांच्या तोंडी असून जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असतानाही कोरोनाचे कारण देत विद्यार्थी शाळेत जाण्याचा विषय टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पॉइंटर-

पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या

पाचवी - १,२२, ७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी -१,१५,९१०

बाहेर कोरोना आहे, विद्यार्थी देताहेत कारण

- पाचवी-सहावीतील विद्यार्थ्यांची बाहेर कोरोना असल्याचे कारण देत शाळेसाठी नकार घंटा सुरू आहे.

- काही विद्यार्थी शाळेसाठी उत्सुक आहेत, परंतु, आईवडिलांना शाळेत सोडण्यासाठी हट्ट करीत शाळेला जाण्यास नकार देत आहेत.

- शाळा सुरू झाल्या तरी अनेक स्कूलबस अद्याप सुरू नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थी स्कूलबस नसल्याचे सांगत आहेत.

- नववी-दहावीच्या अद्याप पूर्ण तासिका होत नाहीत, त्यामुळे ऑनलाइनच बरे असे सांगत काही विद्यार्थी टाळाटाळ करीत आहेत.

- आठवीच्या अनेक विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची इच्छा आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गर्दीमुळे ते शाळेचा कंटाळा करीत आहेत.

वर्ग सुरू करण्याची तयारी

शिक्षण विभागाने शहर व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत १ हजार ७८ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, ग्रामीण भागातील ७ हजार ४३६ शिक्षकांची चाचणी होणार आहे. शहरातील मनपा व खासगी व्यवस्थापनाच्या एकूण ४०५ शाळांमध्ये ग्रामीण भागातील १ हजार ९२३ शाळांमधील पाचवी चे आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत.

कोट-१

बाहेर कोरोना असल्याचे आईबाबांनीच सांगितले आहे. त्यांनी बाहेर खेळायलाही जाऊ दिले नाही. आता अजून स्कूलबसही सुरू झाली नाही. मग शाळेत कसे जायचे?

- संदेश जाधव, पाचवीतील विद्यार्थी

कोट-२

नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी अजून काही विद्यार्थी शाळेत येत नाहीत. तर पाचवी ते आठवीचे वर्ग कशासाठी सुरू केले जात आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा महत्त्वाच्या असल्याने हेच वर्ग सुरू करायला हवे होते.

- भूषण पाटील, सहावीतील विद्यार्थी

कोट-३

आता शाळा सुरू होत असल्याने किमान तीन महिने तरी अभ्यास चांगला होईल. त्याचा पुढच्या वर्षातही फायदा होईल. शाळेत शिक्षकांनी शिकविलेले ऑनलाइनपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल.

- तेजस अहिरे, सातवीतील विद्यार्थी

कोट-४

नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे आता आठवीचे वर्ग सुरू करण्यास हरकत नाही. तसेच स्कूलबसही सुरू होणे आवश्यक आहे. मागील उणीव भरून काढण्यासाठी प्रत्यक्ष वर्गांसोबत ऑनलाइन अभ्यासक्रही सुरूच राहायला हवा

- गौरव टिळे, आठवीतील विद्यार्थी