शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

येवल्यात जनता कर्फ्यूबाबत संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:15 AM

नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचा सर्वपक्षीय व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी निर्णय घेतल्याचे ...

नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचा सर्वपक्षीय व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले होते. यात भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातच कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने प्रशासकीय यंत्रणेने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. दरम्यान, जनता कर्फ्यूच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील बाजारपेठा, भाजीबाजारात खरेदीसाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती. यात सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून येत्या दोन दिवसात बडी रात असल्याने जनता कर्फ्यूबाबत मुस्लिम समाजात नाराजी पसरली आहे.

इन्फो

बाजार समितीही बंद

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीनेही जनता कर्फ्यूदरम्यान कांदा, भाजीपाला व भुसार मालाचा लिलाव बंद ठेवल्याने शेतकरीवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. नियमबाह्यपणे सलग तीन दिवस बाजार समिती बंद ठेवता येत नसल्याबाबत प्रहार शेतकरी संघटनेचे हरीभाऊ महाजन यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे.

कोट....

मुळात शासन निर्बंध आणि केला जात असलेला जनता कर्फ्यू चुकीचा आहे. शासनाने कुठलाही बंद न ठेवता २४ तास दुकाने सुरू ठेवावी. त्यामुळे एकाच वेळी गर्दी होणार नाही. सध्या विशिष्ट वेळेत दुकाने सुरू राहत असल्याने मोठी गर्दी होऊन कोरोना वाढत आहे. जनता कर्फ्यूमुळे काही साध्य होणार नाही. उलट व्यापारी, जनता व शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होणार आहे.

- अ‍ॅड. माणिकराव शिंदे, ज्येष्ठ नेते, येवला