गारठा कायम : नाशिकचे किमान तापमान ७.६ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:15 IST2019-01-03T16:13:44+5:302019-01-03T16:15:36+5:30
सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी पहाटे तसेच रात्री थंडी नागरिकांना अनुभवयास येत आहे. पारा सध्या दहाअंशाच्या खाली असल्यामुळे वातावरणात गारठा टिकून आहे.

गारठा कायम : नाशिकचे किमान तापमान ७.६ अंशावर
नाशिक : मागील चार दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वर सरकण्यास सुरूवात झाली असली तरी अद्याप पारा दहा अंशाच्या खाली स्थिरावत असल्यामुळे पहाटे व रात्री नाशिककरांना थंडीचा कडाका जाणवत आहे. कमाल तपमान मात्र २५अंशावरून तीशीपार सरकल्याने सुर्योदय होताच थंडीपासून नागरिकांना दिवसभर काहीसा दिलासा मिळत आहे. गुरूवारी (दि.३) शहराचे किमान तापमान ७.६ तर कमाल तापमान ३१.८ अंश इतके नोंदविले गेले.
पंधरवड्यापासून थंडीची तीव्रता शहरात कमालीची वाढली आहे. यावर्षी हंगामातील किमान तापमान नीचांकी ५.१अंशापर्यंत खाली आले होते. तसेच कमाल तापमानदेखील २३अंशापर्यंत घसरले होते. यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असली तरी पहाटे तसेच रात्री थंडी नागरिकांना अनुभवयास येत आहे. पारा सध्या दहाअंशाच्या खाली असल्यामुळे वातावरणात गारठा टिकून आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम उत्तर महाराष्टÑातील वातावरणावर होत असून, त्यामुळे नाशिकचे किमान तापमान घसरले आहे. सकाळच्या सुमारास थंडी जाणवत असल्याने जॉगिंग ट्रॅक, जीममध्ये जाणा-यांची संख्या कमी झाली आहे.
काही दिवसांपुर्वी शहरात वाहणा-या थंड वा-याचा वेग ताशी दहा किलोमीटर असा होता; मात्र दोन दिवसांपासून वा-याचा वेग मंदावल्याने कमाल तापमान वाढू लागले आहे. प्रखर सुर्यप्रकाशामुळे दिवसभर वातावरणात उष्मा वाढू लागला आहे. त्यामुळे नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्या दिवसभर उबदार कपडे परिधान करणाºया नाशिककरांकडून सध्या सकाळ-संध्याकाळ ऊबदार कपडे वापरण्यास प्राधान्य देत आहेत. यंदा डिसेंबरअखेर थंडीचा प्रचंड कडाका नागरिकांना अनुभवयास आल्याने नागरिक त्रस्त झाले होते. गेल्या आठवड्यात नाशिक हे राज्यातील सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नोंदविले गेले होते. शहरात नीचांकी ५ अंशापर्यंत पारा घसरला होता.