शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पारा चाळिशीपार नाशिक पुन्हा तापलंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:12 AM

एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.

नाशिक : एकीकडे निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना दुसरीकडे शहराचे हवामानही उष्ण झाले असून, पारा चाळिशीपार गेला आहे. मंगळवारी (दि.२३) शहराचा पारा ४०.१ अंशांपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना उन्हाचे पुन्हा चटके बसू लागले आहेत.निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, आठवड्यावर मतदान येऊन ठेपल्याने उमेदवारांसह त्यांचे नेतेही घामाघुम होऊन प्रचारासाठी उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे शहराचे हवामान दमट झाले असून, शहराच्या वातावरणात उष्मा वाढला आहे. एप्रिलअखेर शहराच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. प्रखर उन्हाची तीव्रता नागरिकांनी मंगळवारी अनुभवली. कमाल तापमान ४०.१ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. किमान तापमान २०.३ अंश इतके नोंदविले गेले. कमाल व किमान तापमानात होणाऱ्या वाढीमुळे वातावरणात कमालीचा उष्मा आणि रात्री उकाडाही जाणवू लागला आहे.त्यामुळे दिवसाचा उष्मा आणि रात्रीचा उकाडा नाशिककरांना असह्य होऊ लागला आहे. चालू महिन्यात १३ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९.७ अंशांपर्यंत गेले होते. आठवडाभरानंतर तापमानाने चाळिशी गाठली आहे. गेल्या महिन्यात २८ तारखेला या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४०.४ इतके कमाल तापमान नोंदविले गेले. एकूणच मार्च महिन्यापासून नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. चालू महिनाअखेरही तापमानाने चाळिशी गाठल्याने महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत पारा मार्च महिन्यातील तापमानाची नोंद मोडून काढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा दिल्लीच्या हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये सूर्य आग ओकणार आहे. या पाच दिवसांत या राज्यांत उष्णतेचा कहर होणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्टÑाच्या वातावरणावरही त्याचा परिणाम जाणवणार आहे. नागरिकांनी पुढील तीन ते चार दिवस विशेष खबरदारी घेत उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यावर भर देण्याची गरज आहे.

टॅग्स :Temperatureतापमानenvironmentवातावरण