शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

ओतूर प्रकल्पासंबंधी १५ दिवसांत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:29 AM

कळवण : सन १९७७ पासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रकल्पा संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येत्या १५ दिवसात मंत्रालयात ओतूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी ओतूर येथे प्रकल्पाला भेटी प्रसंगी ग्रामस्थांना दिले.

ठळक मुद्देअशोक ऊईके : प्रकल्पाला दिलेल्या भेटीत आश्वासन

कळवण : सन १९७७ पासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रकल्पा संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येत्या १५ दिवसात मंत्रालयात ओतूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी ओतूर येथे प्रकल्पाला भेटी प्रसंगी ग्रामस्थांना दिले.ओतूरचे भाजप नेते दादाजी मोरे ,शाबान पठाण ,रमेश रावले ,देवा भुजाडे ,रविकांत सोनवणे,युवराज मोरे ,अशोक मोरे रंगनाथ काळे ,माधव मोरे व अशोक देशमुख यांनी निवेदन देत ओतूर प्रकल्पाची कहाणी कथन करून प्रश्न काम मार्गी लावण्याचे साकडे घातले. आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, १९७७ पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न असून १५ ते २० गावांचा प्रश्न आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत येत असल्याने आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी ओतूर प्रकल्पाच्या अहवालावरून काय प्रयत्न करता येईल याची संपूर्ण तपासणी करून योग्य तो निर्णय घेऊ व १०० टक्के आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही नामदार उईके यांनी दिली.यावेळी आमदार जे पी गावित, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, प्रकल्प नियोजन समितीचे अध्यक्ष एन डी गावित, तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे, विकास देशमुख, निंबा पगार, रमेश थोरात, राजेंद्र ठाकरे, गोविंद कोठावदे, अशोक जाधव, टिनू पगार, दीपक वेढणे, भगवान मोरे, हिरामण वाघ, नितीन वाघ, पोपट पाटील, हेमंत रावले आदींसह मान्यवर उपस्थित होते.आश्वासनांवर आश्वासने१९७७ पासून प्रलंबित ओतूर प्रकल्पाचे काम २०१४ मध्ये तत्कालीन आमदार ए. टी. पवार यांनी सुरु केले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्याने प्रकल्पाचे अंदाजपत्रक वाढले. त्यामुळे प्रकल्प गेल्या पाच वर्षांपासून लालिफतीत अडकला आहे. यापूर्वी तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण ,आमदार जे पी गावित यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तर कळवण तालुक्याच्या दौऱ्यावर २०१५ मध्ये आलेले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर व २०१६ मध्ये आलेले भाजप आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी भेटी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी २०१७ मध्ये उपोषण करून लक्ष वेधले होते. आता केव्हा प्रश्न मार्गी लागतो याकडे लक्ष लागले आहे.