नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असून उन्हाची तीव्रता अन् पाण्याचे दुर्भिक्ष्यामुळे येथील मुक्या जीवांची जीवाची काहिली होत आहे. वन्यजीवांच्या तृष्णेची जाणीव शहरातील ‘इको-एको फाउण्डेशन’च्या स्वयंसेवकांना झाली आणि त्यांनी भूतदयेतून का होईना, या स्वयंसेवकांनी ममदापूर राखीव वन संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक पाणवठे भरण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.
ममदापूर राखीव संवर्धन : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी प्राणीप्रेमींची धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 14:58 IST
मुक्या जीवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउण्डेशनच्या स्वयंसेवकांनी आपआपसांत वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवटे पाण्याने भरण्याचा उपक्रम हाती घेतला.
ममदापूर राखीव संवर्धन : वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी प्राणीप्रेमींची धाव
ठळक मुद्देकोरडेठाक झालेले पाणवटे पाण्याने भरण्याचा उपक्रम आगळीवेगळी गुढी उभारून रविवारी (दि.७) संवर्धन क्षेत्र गाठले. उपक्रम पहिल्या पावसापर्यंत सातत्याने राबविण्याचा मानस