शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

वडाळावासीयांच्या नशिबी मातीमिश्रित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 1:19 AM

पंधरवड्यापासून वडाळागावात विषाणुजन्य आजारांचा फैलाव झाला असताना मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या नळांमधून झाल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान कारभार रुग्णसंख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणारा असल्याची चर्चा गावात सुरू होती.

नाशिक : पंधरवड्यापासून वडाळागावात विषाणुजन्य आजारांचा फैलाव झाला असताना मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा नागरिकांच्या नळांमधून झाल्याने संताप व्यक्त होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा हा गलथान कारभार रुग्णसंख्या वाढविण्यासाठी पूरक ठरणारा असल्याची चर्चा गावात सुरू होती. जणू वडाळावासीयांच्या पाचवीलाच अशुद्ध पाणीपुरवठा पुजलेला आहे की काय? असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या हद्दीत समावेश होऊन अनेक वर्षे लोटली तरी विविध मुलभूत सोयी-सुविधांसाठी वडाळावासीयांच्या नशिबी असलेला संघर्ष अद्याप ‘जैसे-थे’ आहे. पंधरवड्यापासून वडाळागाव परिसरात विषमज्वर, विषाणुजन्य सांधेदुखी, ताप, डोके दुखी, उलट्या, अतिसार अशा आजाराचे रुग्ण वाढले आहे. ‘लोकमत’मधून सातत्याने नागरिकांच्या या समस्येला वाचा फोडली जात असल्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने खडबडून जागे होत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या; मात्र पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार अद्याप थांबलेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शनिवारी (दि.३०) वडाळागावातील झीनतनगर, रजा चौक, राजवाडा, माळी गल्ली, गरीब नवाज कॉलनी, रामोशीवाडा, कोळीवाडा, गोपालवाडी या भागात मातीमिश्रित दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा तासभर झाला. साथीचे आजार व विषाणुजन्य आजाराचे रुग्ण वरील भागातूनच सर्वाधिक आढळले असून, याच भागाला पुन्हा दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागल्याने आरोग्य धोक्यात सापडले आहे.जलवाहिनी दुरुस्तीचे कारणवडाळागाव परिसरात सकाळी झालेल्या दूषित पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे झाल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले; मात्र तब्बल तासभर नळांमधून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकही चक्रावले. नळ वाहते ठेवून रहिवाशांना शुद्ध स्वरूपाच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागली.

टॅग्स :Waterपाणी