शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Maharashtra Election 2019 : महायुतीच्या बंडखोरांवरील कारवाईकडे उमेदवारांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:20 IST

दोन्ही पक्षांकडून अद्यापही या बंडखोरांना थंड करण्याचे अथवा त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने या बंडखोरांना पक्षांतर्गत फूस असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाच्या विरोधात भाजप व सेनेच्या बंडखोरांनी उघडउघड स्वत:चा प्रचार चालविल्याने महायुतीच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. दोन्ही पक्षांकडून अद्यापही या बंडखोरांना थंड करण्याचे अथवा त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने या बंडखोरांना पक्षांतर्गत फूस असल्याचा संशय व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे या बंडखोरांसमवेत पक्षाचे पदाधिकारीही उघडपणे प्रचारात सहभागी होत असल्याने त्याचा मनस्ताप पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला होत आहे.नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत युती व आघाडीच्या जागावाटप सन २००९ च्या निवडणुकीप्रमाणे झाले असून, शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी कायम ठेवली तर भाजपने नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवारी वगळता अन्य तिघा आमदारांना रिंगणात उतरविले आहे.नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनेक इच्छुक असतानाही ही जागा भाजपला सुटल्यामुळे सेनेचे इच्छुक नाराज झाले. त्यातील नगरसेवक विलास श्ािंदे यांनी अपक्ष उमेदवारी करून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्यापुढे अडचण निर्माण केली आहे. शिंदे यांच्या माघारीसाठी पक्षाकडून प्रयत्न केले गेले तरी, त्याला शिंदे यांनी दाद दिली नसल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन सेनेच्या २२ नगरसेवकांनी केले असून, त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी सर्व नगरसेवकांनी हजेरी लावून शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे उघडउघड दाखवून दिले आहे.मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असताना सेनेच्या नगरसेवकांनी तिकडे पाठ फिरवून शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ वाढविल्याची बाब भाजपत अस्वस्थता निर्माण झाली आहे. असाच प्रकार नांदगाव मतदारसंघात झाला असून, नांदगावची जागा सेनेच्या वाट्याची आहे हे माहिती असूनही भाजपच्या जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून नांदगाव मतदारसंघात कामाला लागल्या होत्या. मात्र जागा सेनेला सुटल्याचे पाहूनही त्यांनी व पती रत्नाकर पवार या दोघांनीही नामांकन दाखल केले.माघारीच्या दिवशी मनीषा पवार यांनी माघार घेतली असली तरी रत्नाकर पवार यांनी उमेदवारी कायम ठेवून बंडखोरी केली आहे. खुद्द मनीषा पवार यांनी आपला अर्ज मागे घेताना पक्षाबरोबर राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र शिवसेनेविषयी त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.तिकीट कटले तरी मैदानातआघाडीने २००९ च्या उमेदवारांना कायम ठेवले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून तयारीत असलेल्या इच्छुकांचा उमेदवारी न मिळाल्याने हिरमोड झाला. त्यातील काहींनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेतली तर काहींनी बंडाचे अस्त्र उगारले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNashikनाशिक