शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इकडे बंड, तिकडे बंड कसे करणार थंड! गिरीश महाजन नाशिकमध्ये तीन दिवस ठोकणार तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2024 09:35 IST

भाजपातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने संकटमोचक गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये पाठविले असून तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून नाराजांना सक्रिय करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बंडखोरांचे बंड शमविण्यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी स्थानिक अधिकृत उमेदवार प्रयत्न करीत आहेत, तर काही ठिकाणी मात्र पदांचे आश्वासन देऊन माघार घेतली जात आहे. नाशिक मध्यमध्ये मनसे माघार घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या बंडखोर डॉ. हेमलता पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करीत आहेत, तर भाजपातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने संकटमोचक गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये पाठविले असून तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून असून ते नाराजांना सक्रिय करणार आहेत.

दरम्यान, महाजन यांनी वसंत स्मृती कार्यालयात बैठक घेऊन पंधरा मतदारसंघांचा आढावा घेतला. यातील कोण काम करते आणि करीत नाही याची माहिती संकलित केली असून पुढील ३ दिवस ते नाराजांशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा करणार आहेत. नाशिक शहरात तिन्ही मतदारसंघात भाजपाचे आमदार असून तिघांनाही भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, काही मतदारसंघात राजी-नाराजीचे वातावरण आहे. भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी काही प्रमाणात वाद मिटवण्याचे प्रयत्न केले. नाशिकबाबत गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी (दि.२४) नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर ग्रामीण भागातील बंडखोरांशी तसेच नाराज गटांशी चर्चा केली.

काँग्रेसचे प्रयत्न, मनसेची चर्चा 

नाशिक शहरातील चार मतदारसंघांपैकी नाशिक मध्यमध्ये काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी उमेदवारी डावलल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघातून उद्धवसेनेने वसंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. मतविभागणी टाळण्यासाठी उद्धवसेनेकडून काँग्रेस पक्षाशी संपर्क साधण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधला जात आहे. पक्षाचे नेते महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी राज्यात कोठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचे सांगितले असले तरी डॉ. पाटील यांनी नाशिकमध्ये तत्काळ माघार घेणार नसल्याचे माध्यमांना सांगितले, तर दुसरीकडे नाशिक मध्यमधून मनसेचे उमदेवार अंकुश पवार माघार घेणार असल्याची चर्चा आहे. अर्थात, त्यासाठी भाजपाकडूनच प्रयत्न केले जात असून मतविभागणी टाळण्याचे प्रयत्न आहेत.

देवळालीत वेगळाच पेच 

देवळाली मतदारसंघात वेगळाच पेच असून या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार आमदार सरोज आहिरे यांच्या विरोधात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेने राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदेसेनेने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अजित पवार यात लक्ष घालत असून सोमवारपर्यंत तोडगा काढण्यासाठी धावपळ सुरू आहे.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकNashikनाशिकBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजन