शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:12 IST

चुकीचे काम करताना मर्यादा असतात, त्या भुजबळांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar Slam Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील ही मोठी निवडणूक असल्याने शरद पवार यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारसभांमधून शरद पवार हे राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांनाही लक्ष करत आहेत. येवल्यात झालेल्या सभेत शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चुकीचे काम करताना मर्यादा असतात, त्या भुजबळांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

येवल्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांची लढत छगन भुजबळ यांच्याशी होणार आहे. माणिकराव शिंदे यांच्यासाठी शरद पवार यांनी मंगळवारी सभा घेतली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना चांगलंच समाचार घेतला. मंत्रिपदावर बसल्यावर त्यांनी काहीतरी उद्योग केल्याचेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

"बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हातामध्ये मुंबईचे महापौर पद दिलं. त्याच बाळासाहेब ठाकरेंशी त्यांनी संघर्ष करायचं ठरवलं. बाळासाहेबांची टिंगल केली. एक दिवशी त्यांनी नाईलाजाने दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. बाळासाहेबांची ज्या प्रकारे त्यांनी टिंगल केली होती त्याविषयी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे मला संरक्षण द्या. मला कुठेतरी लपवून ठेवा. आम्ही त्यांना संरक्षण दिलं. नागपूरला नेऊन त्यांची व्यवस्था केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आम्ही तिकीट दिलं तिथे त्यांना यश मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना संधी देऊन विधान परिषदेवर घेण्यात आलं आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर विधानसभेला पुन्हा एकदा संधी दिली. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्यांना आम्ही मंत्रीपदावर बसवलं. मंत्रीपदावर बसल्यावर त्यांनी काहीतरी उद्योग केले आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना ते पद सोडावं लागलं," असं शरद पवार म्हणाले. 

"त्यांना अटक झाली आणि ते तुरुंगात गेले. तुरुंगात गेल्यानंतर अशा स्थितीमध्ये त्यांना कोणी भेटायला तयार नव्हते. माझी मुलगी आणि माझे सहकारी त्यांना भेटून धीर देत होते. त्यांच्या अडचणीच्या काळात आमच्या लोकांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर तुम्ही लोकांनी माझ्या शब्दाची किंमत ठेवली आणि त्यांना विधानसभेत निवडून पाठवलं. निवडून दिल्यानंतर त्यांच्याकडे मंत्री पदाची जबाबदारी दिली. दोन नंबरचा मंत्रीपद त्यांच्याकडे दिला पण दुर्दैवाने तिथेही काही चुका झाल्या. चौकशानंतर त्यांना मंत्रीपद सोडावा लागलं. ते सोडल्यानंतर जे काही झालं ते पुन्हा करणार नाही अशी खात्री त्यांनी आम्हा लोकांना दिली. त्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी विसरलो आणि त्यांना एक प्रकारचं संरक्षण देण्याची भूमिका घेतली," असेही शरद पवार म्हणाले. 

"आत्तापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सहकार्य केले आहे. नंतरच्या काळात आमच्या सहकारी आणि उद्धव ठाकरे यांनी नवीन सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्या सरकारमध्ये भुजबळांना काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आमच्या काही सहकाऱ्यांनी फसवणूक करायचं ठरवलं आणि पक्ष फोडला. ही सगळी स्थिती मला समजली आणि मी ठरवलं पक्ष फोडला असला तरी आपण पुन्हा एकदा लोकांना उभं करू. एक दिवशी सकाळी भुजबळ माझ्याकडे आले आणि म्हणाले की हे जे काही झालं फार वाईट झालं. काही लोकांनी पक्ष फोडला आता ते काही करत आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे. त्यांची समजूत काढली पाहिजे. मी त्यांची समजूत काढायला जाऊ का? मी म्हटलं जायला हरकत नाही. सुधारणा होत असतील तर करा. छगन भुजबळ गेले ते परत आलेच नाहीत ते तिकडेच बसले आणि नंतर कळलं दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. एखाद्या माणसाने चुकीचं काम फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात त्या सगळ्या मध्ये आता भुजबळांनी शिल्लक ठेवलेल्या नाहीत," अशी टीका शरद पवारांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकyevla-acयेवलाSharad Pawarशरद पवारChhagan Bhujbalछगन भुजबळ