शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:12 IST

चुकीचे काम करताना मर्यादा असतात, त्या भुजबळांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar Slam Chhagan Bhujbal : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महाराष्ट्रातील ही मोठी निवडणूक असल्याने शरद पवार यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. प्रचारसभांमधून शरद पवार हे राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांनाही लक्ष करत आहेत. येवल्यात झालेल्या सभेत शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चुकीचे काम करताना मर्यादा असतात, त्या भुजबळांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

येवल्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांची लढत छगन भुजबळ यांच्याशी होणार आहे. माणिकराव शिंदे यांच्यासाठी शरद पवार यांनी मंगळवारी सभा घेतली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना चांगलंच समाचार घेतला. मंत्रिपदावर बसल्यावर त्यांनी काहीतरी उद्योग केल्याचेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

"बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हातामध्ये मुंबईचे महापौर पद दिलं. त्याच बाळासाहेब ठाकरेंशी त्यांनी संघर्ष करायचं ठरवलं. बाळासाहेबांची टिंगल केली. एक दिवशी त्यांनी नाईलाजाने दुसऱ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. बाळासाहेबांची ज्या प्रकारे त्यांनी टिंगल केली होती त्याविषयी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता. त्यांनी आम्हाला सांगितलं की माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे मला संरक्षण द्या. मला कुठेतरी लपवून ठेवा. आम्ही त्यांना संरक्षण दिलं. नागपूरला नेऊन त्यांची व्यवस्था केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आम्ही तिकीट दिलं तिथे त्यांना यश मिळालं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना संधी देऊन विधान परिषदेवर घेण्यात आलं आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर विधानसभेला पुन्हा एकदा संधी दिली. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्यांना आम्ही मंत्रीपदावर बसवलं. मंत्रीपदावर बसल्यावर त्यांनी काहीतरी उद्योग केले आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना ते पद सोडावं लागलं," असं शरद पवार म्हणाले. 

"त्यांना अटक झाली आणि ते तुरुंगात गेले. तुरुंगात गेल्यानंतर अशा स्थितीमध्ये त्यांना कोणी भेटायला तयार नव्हते. माझी मुलगी आणि माझे सहकारी त्यांना भेटून धीर देत होते. त्यांच्या अडचणीच्या काळात आमच्या लोकांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर तुम्ही लोकांनी माझ्या शब्दाची किंमत ठेवली आणि त्यांना विधानसभेत निवडून पाठवलं. निवडून दिल्यानंतर त्यांच्याकडे मंत्री पदाची जबाबदारी दिली. दोन नंबरचा मंत्रीपद त्यांच्याकडे दिला पण दुर्दैवाने तिथेही काही चुका झाल्या. चौकशानंतर त्यांना मंत्रीपद सोडावा लागलं. ते सोडल्यानंतर जे काही झालं ते पुन्हा करणार नाही अशी खात्री त्यांनी आम्हा लोकांना दिली. त्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टी विसरलो आणि त्यांना एक प्रकारचं संरक्षण देण्याची भूमिका घेतली," असेही शरद पवार म्हणाले. 

"आत्तापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सहकार्य केले आहे. नंतरच्या काळात आमच्या सहकारी आणि उद्धव ठाकरे यांनी नवीन सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्या सरकारमध्ये भुजबळांना काम करण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आमच्या काही सहकाऱ्यांनी फसवणूक करायचं ठरवलं आणि पक्ष फोडला. ही सगळी स्थिती मला समजली आणि मी ठरवलं पक्ष फोडला असला तरी आपण पुन्हा एकदा लोकांना उभं करू. एक दिवशी सकाळी भुजबळ माझ्याकडे आले आणि म्हणाले की हे जे काही झालं फार वाईट झालं. काही लोकांनी पक्ष फोडला आता ते काही करत आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे. त्यांची समजूत काढली पाहिजे. मी त्यांची समजूत काढायला जाऊ का? मी म्हटलं जायला हरकत नाही. सुधारणा होत असतील तर करा. छगन भुजबळ गेले ते परत आलेच नाहीत ते तिकडेच बसले आणि नंतर कळलं दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली. एखाद्या माणसाने चुकीचं काम फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात त्या सगळ्या मध्ये आता भुजबळांनी शिल्लक ठेवलेल्या नाहीत," अशी टीका शरद पवारांनी केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकyevla-acयेवलाSharad Pawarशरद पवारChhagan Bhujbalछगन भुजबळ