शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

अशोकस्तंभावरील धोकादायक वाड्याचा उतरवला भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:23 AM

पावसामुळे शहरात धोकादायक वाडे पडण्याचे प्रमाण वाढत असून, जवळपास वीस वाडे पडल्यानंतर महापालिका कृतिशील झाली असून, त्यामुळेच शनिवारी (दि.२४) अशोकस्तंभ येथील लक्ष्मी भवन या वाड्याची धोकादायक भिंत पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.

नाशिक : पावसामुळे शहरात धोकादायक वाडे पडण्याचे प्रमाण वाढत असून, जवळपास वीस वाडे पडल्यानंतर महापालिका कृतिशील झाली असून, त्यामुळेच शनिवारी (दि.२४) अशोकस्तंभ येथील लक्ष्मी भवन या वाड्याची धोकादायक भिंत पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. भाडेकऱ्यांचा विरोध, त्यातच सुरू झालेला पाऊस आणि झालेली वाहतूक कोंडी यामुळे काही भाग अखेरीस तसाच ठेवावा लागला असून, पुढील आठवड्यात तो हटविण्यात येणार आहे.शहरातील गावठाण भाागात अनेक जुने वाडे असून, ते धोकादायक स्थितीत झाले आहेत. जागामालक आणि भाडेकरू यांच्या वादात अनेक वाडे वादग्रस्त ठरले आहेत. तसेच अनेक वाड्यांबाबत न्यायालयात दावेदेखील दाखल आहेत. अशोकस्तंभावरील लक्ष्मी भवन येथील वाडादेखील वादग्रस्त आहे. त्यासंदर्भातील न्यायालयीन लढाई सुरू असली तरी त्याची भींत धोकादायक झाली होती. तसेच काही भाग पडलाही होता. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने ही भिंत उतरवून घेण्याचे ठरविले. त्यानंतर शनिवारी (दि. २४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास या वाड्याच्या धोकादायक भिंतीचा काही भाग हटविण्यात आला.महापालिकेच्या कारवाईच्या वेळी काही स्थानिकांनी विरोध केला असला कोणत्याही प्रकारचे घर अथवा निवासस्थान हटविण्यात आले नाही, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.दुपारी अचानक पाऊस सुरू झाला तसेच रस्त्यावर भिंत पडल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे महापलिकेने कामकाज थांबविले. महापालिकेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी नरसिंगे यांच्या नेतृत्वखाली ही कारवाई राबविण्यात आली.दोरीने ओढून पाडली भिंतमहापालिकेच्या वतीने सदरची कारवाई करताना एका दोराला हूक बांधून ते हूक भिंतीला अडकविण्यात आले आणि त्यानंतर दोरी जेसीबीने ओढण्यात आल्याने जोरदार आवाज झाला आणि भिंत पडली. ही कारवाई बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :HomeघरNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका